शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बँक घोटाळ्यावरून संसदेत गदारोळ! अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दिवस वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:37 IST

पंजाब नॅशनल बँक घोटाळा, नीरव मोदीचे परदेशात पलायन, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी अशा विविध विषयांच्या गदारोळात सोमवारी संसदेची वास्तू दणाणून उठली. बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा पहिला दिवस गोंधळात वाहून गेला.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळा, नीरव मोदीचे परदेशात पलायन, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी अशा विविध विषयांच्या गदारोळात सोमवारी संसदेची वास्तू दणाणून उठली. बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा पहिला दिवस गोंधळात वाहून गेला. परिणामी लोकसभेचे १२ वाजता अन् राज्यसभेचे दुपारी २ वाजता दिवसभराकरता कामकाज तहकूब झाले.आगामी दिवसांत राफेल घोटाळा, बँक घोटाळा, आयएनएक्स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची अटक अशा मुद्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. कार्ती यांची अटक हा सत्ताधाºयांनी सुरू केलेला सूडाचा प्रवास आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.राष्ट्रीकृत बँकांच्या सद्यस्थितीबाबत सरकारने श्वेतपत्रिका जारी करावी, बँक घोटाळयातले आरोपी परदेशात पळून कसे जाऊ शकतात, याबाबत पंतप्रधानांनी सभागृहात निवेदन करावे, अशा मागण्या काँग्रेसने केल्या आहेत. मोदी सरकारच्या कारकिर्दीत संसदीय कामकाजाच्या दृष्टिने हे अखेरचे वर्ष आहे.६७ विधेयके मंजुरीच्या प्रतिक्षेतलोकसभेत २८ पैकी २१ विधेयके चर्चेच्या प्रतिक्षेत आहेत. ७ विधेयके स्थायी समित्या अथवा संयुक्त समित्यांकडे आहेत. मंत्रिमंडळाने मंजूर केलेले फरार आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्यासंबंधीचे विधेयक राज्यसभेत चर्चेला आल्यास नीरव मोदी प्रकरणी विरोधकांच्या अनेक अडचणीच्या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील. नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अ‍ॅथॉरिटी कायम करण्यासाठीही एक नवे विधेयक सादर केले जाणार आहे.राज्यसभेत प्रस्तावित असलेल्या ३९ पैकी १२ विधेयके लोकसभेने अगोदरच मंजूर केलेली आहेत. मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण (तीन तलाक), इंडियन मेडिकल कौन्सिल दुरूस्ती विधेयक, स्थावर संपत्ती अधिग्रहण दुरूस्ती विधेयक, भूसंपादन, पुनर्वसन, नि:पक्ष व पारदर्शी नुकसान भरपाई मोबदला दुरूस्ती विधेयक, व्हिसल ब्लोअर संरक्षण दुरूस्ती विधेयक, मोटार वाहन दुरूस्ती विधेयक, भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरूस्ती विधेयक २0१३ या विधेयकांना राज्यसभेची मंजूरी मिळताच राष्ट्रपतीच्या संमतीने त्यांचे लगेच कायद्यात रूपांतर होईल.सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बँका रिकाम्या झाल्या आहेत. कारण नीरव मोदींसारखे घोटाळेबाज फरार झाले आहेत आणि सरकार गप्प आहे. विरोधी पक्षांचे सर्व सदस्य तयार असतील, तर आमची चर्चेला हरकत नाही.- गुलाम नबी आझाद,विरोधी पक्षनेते, राज्यसभा.

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा