शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

जवानांवर बांगलादेशी ग्रामस्थांचा हल्ला; दोन जणांची प्रकृती गंभीर; शस्त्रेही पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2023 08:22 IST

बीएसएफने जारी केलेल्या निवेदनानुसार, बंगाल फ्रंटियरच्या बेरहामपूर सेक्टर परिसरात ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर १००हून अधिक बांगलादेशी ग्रामस्थांनी हल्ला केला. त्यात दोन जवान गंभीर जखमी झाले. भारतीय शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी बीएसएफचे जवान आपल्या कर्तव्यावर होते. तेव्हाच त्यांच्यावर सीमेपलीकडून हल्लेखोरांनी हल्ला केला आणि त्यांची शस्त्रेही लुटली.

बीएसएफने जारी केलेल्या निवेदनानुसार, बंगाल फ्रंटियरच्या बेरहामपूर सेक्टर परिसरात ही घटना घडली. भारतीय शेतकऱ्यांनी तक्रार केली होती की, बांगलादेशी शेतकरी त्यांची गुरे चरण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांच्या शेतात घुसवतात आणि त्यांच्या पिकांचे जाणूनबुजून नुकसान करतात. भारतीय शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बीएसएफच्या जवानांनी सीमेजवळ तात्पुरती चौकी उभारली होती.

काठ्या, धारदार शस्त्रांनी हल्लाजवानांनी बांगलादेशी शेतकऱ्यांना रोखल्यानंतर गावकरी आणि बदमाशांनी भारतीय हद्दीत घुसून जवानांवर लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांची शस्त्रे हिसकावून हल्लेखोर पळून गेले. यानंतर बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी तत्काळ बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (बीजीबी) अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देत ध्वज बैठक आयोजित करण्यास सांगितले. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश