शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

बांगलादेश-भारताचे सैनिक भिडले! आपले गावकरीही कोयता, दांडे घेऊन नडले, सीमेवर काय काय घडतेय... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:49 IST

बांगलादेशातील या अस्थिरतेचे पडसाद भारतीय सीमेवरही उमटू लागले आहेत. नुकतेच भारतीय जवान आणि बांगलादेशी सैन्य समोरासमोर आले होते.

भारताच्या जीवावर स्वातंत्र्य उपभोगत असलेल्या बांगलादेशने आता भारतालाच डोळे दाखविण्यास सुरुवात केली आहे. शेख हसिना यांचा सत्तापालट झाल्यापासून बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. बांगलादेशातील या अस्थिरतेचे पडसाद भारतीय सीमेवरही उमटू लागले आहेत. नुकतेच भारतीय जवान आणि बांगलादेशी सैन्य समोरासमोर आले होते. परंतू, गाववाल्यांनी रौद्ररुप दाखविताच बांगलादेशी सैनिक आल्या पावली परत माघारी पळून गेले आहेत. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात भारत-बांगलादेश सीमेवर नुकताच हा तणावाचा प्रसंग आला होता. सीमा सुरक्षा दलाचे जवान भारतीय हद्दीत काम करत होते, याला बांगलादेशच्या सैन्याने आक्षेप घेतला. यामुळे दोन्ही सैन्यात बाचाबाची सुरु झाली. ही बातमी सुकदेबपुरच्या गावकऱ्यांना समजली आणि ते कोयता, मोठाले सुरे, दांडे घेऊन सीमेवर दाखल झाले. 

भारतीय नागरिकांचे रौद्ररुप पाहून बांगलादेशी सैनिकांची तंतरली आणि तिथून त्यांनी काढता पाय घेतला. यावेळी गावकऱ्यांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम” आणि “जय श्री राम”चे नारे देण्यास सुरुवात केली. बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी बीएसएफ कठोर पाऊले उचलत असताना हा वाद झाला आहे.   

सीमेवर कुंपण घालण्याच्या प्रकल्पाला दोन्ही देशांनी पूर्व-मंजूरी दिलेली होती. तरीही बांगलादेशी सैनिक त्याला विरोध करण्यासाठी आले होते. बीएसएफने अधिकारी पातळीवर या वादावर बांगलादेशला याची कल्पना दिली. यानंतर हा वाद मिटविण्यात आला. भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते सुवेंदु अधिकारी यांनी या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

 

टॅग्स :BangladeshबांगलादेशBSFसीमा सुरक्षा दल