शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आपमधील अंतर्गत कलहावर मलमपट्टी

By admin | Updated: May 4, 2017 01:15 IST

आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलहावर मलमपट्टी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते कुमार विश्वास यांच्यावर

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलहावर मलमपट्टी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते कुमार विश्वास यांच्यावर घरभेदीपणाचे आरोप करणारे आमदार अमानुल्ला खान यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून, विश्वास यांच्यावर राजस्थानचे निवडणूक प्रमुखपद म्हणून नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ओखला येथून निवडून आलेल्या आमदार खान यांनी विश्वास हे भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला होता. आपचे समन्वयक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या (पीएसी) बैठकीत खान यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. खान यांच्या टिपणीनंतर विश्वास यांनी मंगळवारी पक्षातील आपल्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्याचे सांगत आपसोबतचे नाते तोडण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, निलंबनाच्या निर्णयावर खान यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बैठकीनंतर शिसोदिया यांनी खान यांचीही भेट घेतल्याचे समजते. विश्वास यांची नाराजी दूर करण्यासाठी खान यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जाते.  खान यांच्या विधानाची चौकशी करण्यासाठी पक्षनेते पंकज गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर खान यांच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाईल, असे शिसोदिया यांनी सांगितले. विश्वास यांच्यावरील जबाबदारी वाढविण्यात आली असून, त्यांना राजस्थानचे प्रभारीपद देण्यात आले आहे. राजस्थानात पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. नेत्यांमधील गैरसमज आता दूर झाले आहेत, असे सांगून शिसोदिया यांनी कुमार विश्वास यांची नाराजी दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. केजरीवाल आणि शिसोदिया यांनी काल रात्री विश्वास यांची त्यांच्या गाजियाबाद येथील निवासस्थानी भेट घेऊन मतभेद दूर करण्याचे प्रयत्न केले होते. पीएसी बैठकीत विश्वास सातत्याने पक्षाच्या घटनेचा हवाला देत एक व्यक्ती एक पद धोरण लागू करण्याच्या मागणीवर अडून बसले होते. हे धोरण लागू केल्यानंतर केजरीवाल यांना पक्षाचे समन्वयक किंवा मुख्यमंत्री यापैकी एक पद सोडावे लागणार होते. विश्वास यांना पाठिंबा देणाऱ्या जवळपास डझनभर आमदारांनी दुसरा फॉर्म्युला मांडत उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. दरम्यान, विश्वास यांनी टष्ट्वीट करून पक्षातील वाद मिटवण्याचे संकेत दिले. जर कोणी अंधाराशी लढण्याचा निर्धार केला तर एकटा काजवाही अंधाराला पराभूत करतो. लढू, जिंकू, आभार, भारत माता की जय, असे टष्ट्वीट विश्वास यांनी केले.