शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

दिल्लीत घुमला बळीराजाचा आवाज; भाजपाविरोधातील पक्ष शेतकऱ्यांसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 05:51 IST

एल्गार : देशातील लाखाहून अधिक शेतकºयांचा सहभाग

- विश्वास खोड/सुमेध बनसोड

नवी दिल्ली : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, या मागणीची विधेयके संसदेने मान्य न केल्यास भाजपा सरकारला जावे लागेल, असा इशारा जंतरमंतर येथे शेतकरी नेत्यांनी दिला. देशभरातून आलेले शेतकरी संसद भवनाबाहेर ‘नरेंद्र मोदी, किसानविरोधी’ अशा घोषणा देत होते.

या मोर्चाला भाजपाविरोधातील सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आणि विशेष म्हणजे त्या पक्षांचे नेतेही मोर्चानंतरच्या सभेत सहभागी झाले. त्यामुळे हा मोर्चा मोदीविरोधकांचे व्यासपीठच बनला होता.

किसान संघर्ष समन्वयन समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रामलीला मैदानातून प्रचंड मोर्चा काढला. जंतरमंतर येथे सभेमध्ये कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, फारुख अब्दुल्ला, सीताराम येचुरी, शरद यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, समन्वयन समितीचे निमंत्रक व्ही.एम. सिंग, मेधा पाटकर आदींनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.शेतकऱ्यांच्या भविष्याचा व युवकांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट आहे. हे युद्ध शेतकरी-युवकांच्या भविष्यासाठीचे आहे. मोदी धनाढ्यांचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करतात, मग कोट्यवधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होत नाही, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला. शरद पवार यांनी शेतकºयांविषयी सत्ताधाºयांच्या मनात आकस असल्याचा आरोप केला.

साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांला ३० हजार रुपयांचे कर्ज मिळत नाही, भाजपा कार्यालयासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च केले जातात, अशी टीका करून खा. राजू शेट्टी यांनी शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी, उत्पादन खर्चाच्या दीडपट भावासाठी विशेष अधिवेशन का घेतले जात नाही, असा सवाल केला.कोणाचा सहभाग?महाराष्ट्रातील लोकसंघर्ष संघटनेच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह तामिळनाडूचे अय्याकोंडू, कम्युनिस्ट कार्यकर्ते हनन मौला, पंजाबमधील बुटासिंग बुडगिल, तेजिंदरसिंग विर्क, उत्तर प्रदेशमधील आशिष मित्तल, कर्नाटकातील नेते कोडीहेल्लू चंद्रशेखर, मध्य प्रदेशातील डॉ. सुनीलम, रामसिंग स्वराज अभियानचे योगेंद्र यादव, शेतीविषयक प्रश्नाचे अभ्यासक पी. साईनाथ, निवृत्त मेजर जनरल सतवीरसिंग, कम्युनिस्ट नेते अतुल अन्जान यांनीही भाषणांद्वारे शेतकºयांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. देशभरातील २१0 शेतकरी संघटना यात सहभागी झाल्या.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली