शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत घुमला बळीराजाचा आवाज; भाजपाविरोधातील पक्ष शेतकऱ्यांसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 05:51 IST

एल्गार : देशातील लाखाहून अधिक शेतकºयांचा सहभाग

- विश्वास खोड/सुमेध बनसोड

नवी दिल्ली : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, या मागणीची विधेयके संसदेने मान्य न केल्यास भाजपा सरकारला जावे लागेल, असा इशारा जंतरमंतर येथे शेतकरी नेत्यांनी दिला. देशभरातून आलेले शेतकरी संसद भवनाबाहेर ‘नरेंद्र मोदी, किसानविरोधी’ अशा घोषणा देत होते.

या मोर्चाला भाजपाविरोधातील सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आणि विशेष म्हणजे त्या पक्षांचे नेतेही मोर्चानंतरच्या सभेत सहभागी झाले. त्यामुळे हा मोर्चा मोदीविरोधकांचे व्यासपीठच बनला होता.

किसान संघर्ष समन्वयन समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रामलीला मैदानातून प्रचंड मोर्चा काढला. जंतरमंतर येथे सभेमध्ये कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, फारुख अब्दुल्ला, सीताराम येचुरी, शरद यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, समन्वयन समितीचे निमंत्रक व्ही.एम. सिंग, मेधा पाटकर आदींनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.शेतकऱ्यांच्या भविष्याचा व युवकांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट आहे. हे युद्ध शेतकरी-युवकांच्या भविष्यासाठीचे आहे. मोदी धनाढ्यांचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करतात, मग कोट्यवधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होत नाही, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला. शरद पवार यांनी शेतकºयांविषयी सत्ताधाºयांच्या मनात आकस असल्याचा आरोप केला.

साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांला ३० हजार रुपयांचे कर्ज मिळत नाही, भाजपा कार्यालयासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च केले जातात, अशी टीका करून खा. राजू शेट्टी यांनी शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी, उत्पादन खर्चाच्या दीडपट भावासाठी विशेष अधिवेशन का घेतले जात नाही, असा सवाल केला.कोणाचा सहभाग?महाराष्ट्रातील लोकसंघर्ष संघटनेच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह तामिळनाडूचे अय्याकोंडू, कम्युनिस्ट कार्यकर्ते हनन मौला, पंजाबमधील बुटासिंग बुडगिल, तेजिंदरसिंग विर्क, उत्तर प्रदेशमधील आशिष मित्तल, कर्नाटकातील नेते कोडीहेल्लू चंद्रशेखर, मध्य प्रदेशातील डॉ. सुनीलम, रामसिंग स्वराज अभियानचे योगेंद्र यादव, शेतीविषयक प्रश्नाचे अभ्यासक पी. साईनाथ, निवृत्त मेजर जनरल सतवीरसिंग, कम्युनिस्ट नेते अतुल अन्जान यांनीही भाषणांद्वारे शेतकºयांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. देशभरातील २१0 शेतकरी संघटना यात सहभागी झाल्या.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली