शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच पत्र लिहिलेले; रेल्वे अपघात टळला असता, पण लक्षच दिले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 08:30 IST

रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच एक पत्र रेल्वे बोर्डाला लिहिले होते. त्यात एखाद्या अपघाताचा उल्लेख करण्यात आला होता. तात्काळ सुधारणा न केल्यास अपघात घडू शकतो असे त्याने म्हटले होते.

बालासोरसारखाच २०१४ मध्ये गोरखधाम एक्स्प्रेसचा चुरेब आणि २०१८ मध्ये हरचंदपूरमध्ये न्यू फरक्का एक्सप्रेसला अपघात झाला होता. या दोन्ही अपघातांच्या चौकशीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी रेल्वेच्या फुलप्रूफ सिग्नल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कालच्या अपघातावर आता आणखी एक महत्वाची व धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. 

रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच एक पत्र रेल्वे बोर्डाला लिहिले होते. त्यात एखाद्या अपघाताचा उल्लेख करण्यात आला होता. तात्काळ सुधारणा न केल्यास अपघात घडू शकतो असे त्याने म्हटले होते. मात्र, त्याच्या या पत्राकडे दुर्लक्ष केले गेले. या अधिकाऱ्याचे हे पत्र आता व्हायरल होत आहे. यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वत: त्याची दखल घेतली असून या अधिकाऱ्याशी चर्चा केली आहे. 

भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट (इरिटेम) चे महासंचालक हरिशंकर वर्मा हे जवळपास तीन वर्षांपासून दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये तैनात आहेत. हरिशंकर वर्मा जेव्हा तेथे प्रिन्सिपल चीफ ऑपरेशनल मॅनेजर (पीसीओएम) बनले, तेव्हा चुकीच्या मार्गावर ट्रेन जात असल्याची काही प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणी सुरुवातीला स्टेशन मास्तरला जबाबदार धरण्यात आले होते. परंतू, वारंवार असे घडत असल्याचे पाहून वर्मा स्वत: तिकडे पाहणीसाठी गेले होते. यावेळी 8 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू-नवी दिल्ली संपर्कक्रांती एक्स्प्रेस मेन लाइनचा सिग्नल देऊनही चुकीच्या मार्गावर जात होती. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे ही घटना टाळता आली. 

इंटरलॉकिंगसाठी बनवलेल्या यंत्रणेला बायपास करून लोकेशन बॉक्समध्ये छेडछाड केल्याचे तिथे समोर आले होते. हा प्रकार तातडीने थांबविण्यासाठी रेल्वे बोर्डाला त्यांनी पत्र लिहिले होते. या पत्रानंतरही रेल्वे बोर्डाने काहीच अॅक्शन घेतली नाही आणि कोरोमंडल एक्स्प्रेसोबत मोठी दुर्घटना घडली. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव