शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच पत्र लिहिलेले; रेल्वे अपघात टळला असता, पण लक्षच दिले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 08:30 IST

रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच एक पत्र रेल्वे बोर्डाला लिहिले होते. त्यात एखाद्या अपघाताचा उल्लेख करण्यात आला होता. तात्काळ सुधारणा न केल्यास अपघात घडू शकतो असे त्याने म्हटले होते.

बालासोरसारखाच २०१४ मध्ये गोरखधाम एक्स्प्रेसचा चुरेब आणि २०१८ मध्ये हरचंदपूरमध्ये न्यू फरक्का एक्सप्रेसला अपघात झाला होता. या दोन्ही अपघातांच्या चौकशीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी रेल्वेच्या फुलप्रूफ सिग्नल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कालच्या अपघातावर आता आणखी एक महत्वाची व धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. 

रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच एक पत्र रेल्वे बोर्डाला लिहिले होते. त्यात एखाद्या अपघाताचा उल्लेख करण्यात आला होता. तात्काळ सुधारणा न केल्यास अपघात घडू शकतो असे त्याने म्हटले होते. मात्र, त्याच्या या पत्राकडे दुर्लक्ष केले गेले. या अधिकाऱ्याचे हे पत्र आता व्हायरल होत आहे. यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वत: त्याची दखल घेतली असून या अधिकाऱ्याशी चर्चा केली आहे. 

भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट (इरिटेम) चे महासंचालक हरिशंकर वर्मा हे जवळपास तीन वर्षांपासून दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये तैनात आहेत. हरिशंकर वर्मा जेव्हा तेथे प्रिन्सिपल चीफ ऑपरेशनल मॅनेजर (पीसीओएम) बनले, तेव्हा चुकीच्या मार्गावर ट्रेन जात असल्याची काही प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणी सुरुवातीला स्टेशन मास्तरला जबाबदार धरण्यात आले होते. परंतू, वारंवार असे घडत असल्याचे पाहून वर्मा स्वत: तिकडे पाहणीसाठी गेले होते. यावेळी 8 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू-नवी दिल्ली संपर्कक्रांती एक्स्प्रेस मेन लाइनचा सिग्नल देऊनही चुकीच्या मार्गावर जात होती. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे ही घटना टाळता आली. 

इंटरलॉकिंगसाठी बनवलेल्या यंत्रणेला बायपास करून लोकेशन बॉक्समध्ये छेडछाड केल्याचे तिथे समोर आले होते. हा प्रकार तातडीने थांबविण्यासाठी रेल्वे बोर्डाला त्यांनी पत्र लिहिले होते. या पत्रानंतरही रेल्वे बोर्डाने काहीच अॅक्शन घेतली नाही आणि कोरोमंडल एक्स्प्रेसोबत मोठी दुर्घटना घडली. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव