शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

बजरंग दल, विहिंपला केंद्राचं छुपं प्रोत्साहन- मल्लिकार्जून खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:54 IST

देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले.

ठळक मुद्दे देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले.काँग्रेसचे नते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांना केंद्र सरकारकडून छुपं प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप मल्लिकार्जून खरगे यांनी केला

नवी दिल्ली, दि. 31- देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी काँग्रेसचे नते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांना केंद्र सरकारकडून छुपं प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी केला. गेल्या ७० वर्षात देशात अशा घटना घडल्या नव्हत्या पण मोदी सरकार आल्यावर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्याची टीका मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. 

देशातील विविध राज्यांमध्ये सर्वसामान्यांना फक्त संशयावरून जमावाकडून मारहाण तसंच हत्या झाल्याची घटना समोर आली होती. यावरुन लोकसभेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या ७० वर्षात देशात अशा स्वरुपाच्या घटना घडली नव्हती. भाजपशी संबंधीत असलेल्या संघटनांचा या घटनांशी संबंध आहे,असं खरगे म्हणाले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांचा हल्ल्यांशी संबंध असल्याचं समोर आलं. पण त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप खरगेंनी केला. मध्य प्रदेश, झारखंड हे राज्य जमावाकडून होणाऱ्या मारहाणीचे केंद्र बनल्याची टीका खरगे यांनी केली आहे. देशात दलित, अल्पसंख्याक आणि महिलांची हत्या होत असून भाजप या मारेकऱ्यांचे समर्थन करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देशभरात सध्या दहशत आणि भीतीचं वातावरण असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

भाजपकडून काँग्रेसला उत्तर

काँग्रेसच्या या आरोपांवर भाजपकडूनही उत्तर देण्यात आलं. भाजप खासदार हुकूमदेव नारायण यादव यांनीदेखील चर्चेत सहभाग घेत काँग्रेसवर टीका केली. मोदींनी या घटनांचा निषेध दर्शवला आहे. आता कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यांची आहे. केंद्र सरकार दरवेळी निमलष्करी दलाची तुकडी पाठवू शकत नाही, असं हुकुमदेव नारायण यादव म्हणाले आहेत. तसंच ट्रेनमध्ये जुनेदच्या झालेल्या हत्येचा उल्लेखही यादव यांनी केला. ट्रेनमध्ये सीटच्या वादावरून जुनेदची हत्या झाली होती. या घटनेला धर्माशी का जोडता ? असा सवालही यादव यांनी केला.

गुजरातच्या मुद्द्यावरूनही टीकाराज्यसभेत काँग्रेसने गुजरातच्या मुदुद्यावरुन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी संसदेच कामकाज सुरू होताच काँग्रेसकडून गुजरातच्या मुद्द्यावर गदारोळ केला. भाजप काँग्रेसचे आमदार विकत घेत असल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. काँग्रेस खासदारांच्या गदारोळामुळे कामकाज काही वेळेसाठी तहकूब करावं लागलं. यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी वेल जवळ येऊन घोषणाबाजीही केली.