शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बजरंग दल, विहिंपला केंद्राचं छुपं प्रोत्साहन- मल्लिकार्जून खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:54 IST

देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले.

ठळक मुद्दे देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले.काँग्रेसचे नते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांना केंद्र सरकारकडून छुपं प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप मल्लिकार्जून खरगे यांनी केला

नवी दिल्ली, दि. 31- देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी काँग्रेसचे नते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांना केंद्र सरकारकडून छुपं प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी केला. गेल्या ७० वर्षात देशात अशा घटना घडल्या नव्हत्या पण मोदी सरकार आल्यावर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्याची टीका मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. 

देशातील विविध राज्यांमध्ये सर्वसामान्यांना फक्त संशयावरून जमावाकडून मारहाण तसंच हत्या झाल्याची घटना समोर आली होती. यावरुन लोकसभेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या ७० वर्षात देशात अशा स्वरुपाच्या घटना घडली नव्हती. भाजपशी संबंधीत असलेल्या संघटनांचा या घटनांशी संबंध आहे,असं खरगे म्हणाले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांचा हल्ल्यांशी संबंध असल्याचं समोर आलं. पण त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप खरगेंनी केला. मध्य प्रदेश, झारखंड हे राज्य जमावाकडून होणाऱ्या मारहाणीचे केंद्र बनल्याची टीका खरगे यांनी केली आहे. देशात दलित, अल्पसंख्याक आणि महिलांची हत्या होत असून भाजप या मारेकऱ्यांचे समर्थन करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देशभरात सध्या दहशत आणि भीतीचं वातावरण असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

भाजपकडून काँग्रेसला उत्तर

काँग्रेसच्या या आरोपांवर भाजपकडूनही उत्तर देण्यात आलं. भाजप खासदार हुकूमदेव नारायण यादव यांनीदेखील चर्चेत सहभाग घेत काँग्रेसवर टीका केली. मोदींनी या घटनांचा निषेध दर्शवला आहे. आता कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यांची आहे. केंद्र सरकार दरवेळी निमलष्करी दलाची तुकडी पाठवू शकत नाही, असं हुकुमदेव नारायण यादव म्हणाले आहेत. तसंच ट्रेनमध्ये जुनेदच्या झालेल्या हत्येचा उल्लेखही यादव यांनी केला. ट्रेनमध्ये सीटच्या वादावरून जुनेदची हत्या झाली होती. या घटनेला धर्माशी का जोडता ? असा सवालही यादव यांनी केला.

गुजरातच्या मुद्द्यावरूनही टीकाराज्यसभेत काँग्रेसने गुजरातच्या मुदुद्यावरुन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी संसदेच कामकाज सुरू होताच काँग्रेसकडून गुजरातच्या मुद्द्यावर गदारोळ केला. भाजप काँग्रेसचे आमदार विकत घेत असल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. काँग्रेस खासदारांच्या गदारोळामुळे कामकाज काही वेळेसाठी तहकूब करावं लागलं. यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी वेल जवळ येऊन घोषणाबाजीही केली.