शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

बजरंग दल, विहिंपला केंद्राचं छुपं प्रोत्साहन- मल्लिकार्जून खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:54 IST

देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले.

ठळक मुद्दे देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले.काँग्रेसचे नते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांना केंद्र सरकारकडून छुपं प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप मल्लिकार्जून खरगे यांनी केला

नवी दिल्ली, दि. 31- देशभरात जमावाकडून लोकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी काँग्रेसचे नते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांना केंद्र सरकारकडून छुपं प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी केला. गेल्या ७० वर्षात देशात अशा घटना घडल्या नव्हत्या पण मोदी सरकार आल्यावर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्याची टीका मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. 

देशातील विविध राज्यांमध्ये सर्वसामान्यांना फक्त संशयावरून जमावाकडून मारहाण तसंच हत्या झाल्याची घटना समोर आली होती. यावरुन लोकसभेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या ७० वर्षात देशात अशा स्वरुपाच्या घटना घडली नव्हती. भाजपशी संबंधीत असलेल्या संघटनांचा या घटनांशी संबंध आहे,असं खरगे म्हणाले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांचा हल्ल्यांशी संबंध असल्याचं समोर आलं. पण त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप खरगेंनी केला. मध्य प्रदेश, झारखंड हे राज्य जमावाकडून होणाऱ्या मारहाणीचे केंद्र बनल्याची टीका खरगे यांनी केली आहे. देशात दलित, अल्पसंख्याक आणि महिलांची हत्या होत असून भाजप या मारेकऱ्यांचे समर्थन करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देशभरात सध्या दहशत आणि भीतीचं वातावरण असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

भाजपकडून काँग्रेसला उत्तर

काँग्रेसच्या या आरोपांवर भाजपकडूनही उत्तर देण्यात आलं. भाजप खासदार हुकूमदेव नारायण यादव यांनीदेखील चर्चेत सहभाग घेत काँग्रेसवर टीका केली. मोदींनी या घटनांचा निषेध दर्शवला आहे. आता कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यांची आहे. केंद्र सरकार दरवेळी निमलष्करी दलाची तुकडी पाठवू शकत नाही, असं हुकुमदेव नारायण यादव म्हणाले आहेत. तसंच ट्रेनमध्ये जुनेदच्या झालेल्या हत्येचा उल्लेखही यादव यांनी केला. ट्रेनमध्ये सीटच्या वादावरून जुनेदची हत्या झाली होती. या घटनेला धर्माशी का जोडता ? असा सवालही यादव यांनी केला.

गुजरातच्या मुद्द्यावरूनही टीकाराज्यसभेत काँग्रेसने गुजरातच्या मुदुद्यावरुन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी संसदेच कामकाज सुरू होताच काँग्रेसकडून गुजरातच्या मुद्द्यावर गदारोळ केला. भाजप काँग्रेसचे आमदार विकत घेत असल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. काँग्रेस खासदारांच्या गदारोळामुळे कामकाज काही वेळेसाठी तहकूब करावं लागलं. यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी वेल जवळ येऊन घोषणाबाजीही केली.