शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तीन मोबाइल कंपन्यांवर कारवाईचा बडगा !

By admin | Updated: October 23, 2016 01:14 IST

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने भारती एअरटेल, वोडाफोन व आयडिया या तीन टेलिकॉम कंपन्यांना ३0५0 कोटी रुपये दंड ठोठावण्याची शिफारस दूरसंचार

नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने भारती एअरटेल, वोडाफोन व आयडिया या तीन टेलिकॉम कंपन्यांना ३0५0 कोटी रुपये दंड ठोठावण्याची शिफारस दूरसंचार विभागाला केली आहे. एअरटेल, वोडाफोन व आयडिया या कंपन्यांच्या नेटवर्कशी रिलायन्स जिओ ग्राहकांकडून केले जाणारे फोन जोडले जात नसून, जोडणीमध्ये अडथळे येत असल्यामुळे हा दंड वसूल करण्याची शिफारस केली आहे. भारती एअरटेल व वोडाफोन यांना प्रत्येकी २१ सर्कलसाठी प्रत्येकी ५0 कोटी रुपये याप्रमाणे प्रत्येकी १0५0 कोटी तर आयडियाच्या १९ सर्कलसाठी प्रत्येकी ५0 कोटीप्रमाणे ९५0 कोटी रु. असा दंड घेतला जाईल.रिलायन्स जिओला ५ सप्टेंबर रोजी सेवा सुरू करताच, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही दिवसांनी अन्य नेटवर्कशी कॉल जोडले जात नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यामुळे अन्य मोबाइल कंपन्या जिओ ग्राहकांना फोन जोडणी उपलब्ध करुन देत नसून, आपल्या ग्राहकांची गैरसोय होत आहे, अशी तक्रार जिओ कंपनीने ‘ट्राय’कडे केली होती. त्याची शहानिशा करून, ‘ट्राय’ने या तीन कंपन्यांना दंड करण्याची शिफारस दूरसंचार विभागाला केली आहे. या तीन कंपन्या नियम व अटींचे पालन करत नसल्याचे दिसते. जिओ नेटवर्क ग्राहकांना अन्य नेटवर्कशी जोडू न देण्यामागे संबंधित कंपनीला स्पर्धेत उतरू न देण्याची भूमिका ग्राहकांच्या हिताच्या विरोधातील आहे, असे ट्रायने म्हटले आहे. मोबाइल ग्राहकांच्या असुविधेमध्ये आणखी भर पडू नये म्हणूनच केवळ या तीन कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची शिफारस आपण करीत नाही आहोत, असे ट्रायने नमूद केले आहे. एअरटेल, वोडाफोन व आयडिया नेटवर्कने जिओ ग्राहकांना इंटरकनेक्शन सुविधा न पुरवल्याने ७५ टक्के कॉल अन्य नेटवर्कशी जोडले गेले नाही, असा दावा जिओने केला होता. प्रतिक्रिया नाहीएक हजार कॉलमधील कॉलपैकी पाचहून अधिक कॉल जोडण्यात अपयश येता कामा नये, असा नियम आहे. मात्र, रिलायन्स जिओ प्रकरणात एक हजारातील सुमारे ९६0 कॉल अन्य मोबाईल नेटवर्कशी जोडलेच जाऊ शकले नाहीत, असे जिओचे म्हणणे आहे. दंडाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास तिन्ही कंपन्यांनी तूर्त तरी टाळले आहे.