शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

सामान्यांना आले बुरे दिन!

By admin | Updated: July 22, 2016 04:29 IST

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत.

नवी दिल्ली : गगनाला भिडलेली महागाई आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. सांगा, या लोकांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल आज काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी राज्यसभेत केला. तुम्ही अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आला आहात; पण वस्तुस्थिती ही आहे की, आता लोकच म्हणत आहेत की, यापेक्षा आपले बुरे दिनच बरे होते, असा टोमणाही त्यांनी मारला. सरकारची आर्थिक धोरणंच असफल झाल्याची टीकाही तिवारी यांनी केली. राज्यसभेत शून्य काळात प्रमोद तिवारी यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, सत्तारूढ पक्ष जेव्हा मत मागण्यासाठी जाईल तेव्हा त्यांना महागाईच्या मुद्यावरून महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. वेगाने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. >डाळी का भडकल्या? प्रमोद तिवारी म्हणाले की, रोजच्या जगण्यातील प्रत्येक आवश्यक वस्तू महाग झाली आहे, तर किमतीतील ही दरवाढ सुरूच आहे. त्यांनी असाही आरोप केला की, सत्तेत बसलेल्या काही जणांनी खास लोकांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आज डाळींच्या किमती प्रति किलो २०० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. महागाईमुळे भाज्या खरेदी करणे अशक्य झाले आहे. औद्योगिक विकास ठप्प झाला आहे. महागाई दर ५.७७ टक्क्यांवर गेला आहे. निर्यातीत १८ मार्चपासून घट दिसून येत आहे. >टोमॅटो, बटाटे, कांदे महागले एका अहवालानुसार ही महागाई विशेषत: टोमॅटो, बटाटे, कांदे यांच्याशी संबंधित आहे. बटाट्यांच्या किमतीत दर दुसऱ्या वर्षी वाढ होते, तर कांद्याचे व टोमॅटोचे दरही दर अडीच वर्षांनी वाढतात. एक वर्षांच्या अंतराने विशिष्ट भाज्यांच्या, वस्तूंच्या बाबतीत ही महागाई दिसून येते. हाच तर्क गृहीत धरला तर पुढील वर्षी कांद्याचे भाव भडकू शकतात, असेही या अहवालात म्हटले आहे. वस्तूंच्या चढ्या दराला कधी मोठे व्यापारीही कारणीभूत असतात.