शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

सामान्यांना आले बुरे दिन!

By admin | Updated: July 22, 2016 04:29 IST

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत.

नवी दिल्ली : गगनाला भिडलेली महागाई आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. सांगा, या लोकांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल आज काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी राज्यसभेत केला. तुम्ही अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आला आहात; पण वस्तुस्थिती ही आहे की, आता लोकच म्हणत आहेत की, यापेक्षा आपले बुरे दिनच बरे होते, असा टोमणाही त्यांनी मारला. सरकारची आर्थिक धोरणंच असफल झाल्याची टीकाही तिवारी यांनी केली. राज्यसभेत शून्य काळात प्रमोद तिवारी यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, सत्तारूढ पक्ष जेव्हा मत मागण्यासाठी जाईल तेव्हा त्यांना महागाईच्या मुद्यावरून महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. वेगाने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. >डाळी का भडकल्या? प्रमोद तिवारी म्हणाले की, रोजच्या जगण्यातील प्रत्येक आवश्यक वस्तू महाग झाली आहे, तर किमतीतील ही दरवाढ सुरूच आहे. त्यांनी असाही आरोप केला की, सत्तेत बसलेल्या काही जणांनी खास लोकांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आज डाळींच्या किमती प्रति किलो २०० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. महागाईमुळे भाज्या खरेदी करणे अशक्य झाले आहे. औद्योगिक विकास ठप्प झाला आहे. महागाई दर ५.७७ टक्क्यांवर गेला आहे. निर्यातीत १८ मार्चपासून घट दिसून येत आहे. >टोमॅटो, बटाटे, कांदे महागले एका अहवालानुसार ही महागाई विशेषत: टोमॅटो, बटाटे, कांदे यांच्याशी संबंधित आहे. बटाट्यांच्या किमतीत दर दुसऱ्या वर्षी वाढ होते, तर कांद्याचे व टोमॅटोचे दरही दर अडीच वर्षांनी वाढतात. एक वर्षांच्या अंतराने विशिष्ट भाज्यांच्या, वस्तूंच्या बाबतीत ही महागाई दिसून येते. हाच तर्क गृहीत धरला तर पुढील वर्षी कांद्याचे भाव भडकू शकतात, असेही या अहवालात म्हटले आहे. वस्तूंच्या चढ्या दराला कधी मोठे व्यापारीही कारणीभूत असतात.