शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

'बाबरी मशीद पुन्हा बांधा', उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये झळकले पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 14:25 IST

उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मेरठमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

लखनऊ- बाबरी मशीद विध्वंसाच्या घटनेला आज 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्षांनंतर आज म्हणजेच बुधवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला मंगळवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मेरठमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोस्टर लावण्याच्या मागे याच संघटनेचा हात असल्याचं बोललं जातं आहे. 

 

पोस्टरनुसार या आंदोलनाची चिथावणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) दिली जाते आहे. 'हम भूल न जाएं, धोखे के 25 साल, बाबरी मस्जिद की दोबारा तामीर करो।', असं पोस्टरवर नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ, गाझियाबाद, अलीगढ, हाथरस आणि सहारनपूरमधील शहरात आंदोलनाचे पोस्टर्स लावण्यात आल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पीएफआय पश्चिम यूपीतील काही लोकांना एकत्र करून दिल्लीत आंदोलन करण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हंटलं आहे.

बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा बजरंग दल आणि शिवसेनेने केली आहे. या दिवशी नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच, अशांतता पसरवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने संशयित हालचालींवर करडी नजर ठेवण्याचं आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्थाबाबरी मशीद विध्वंसाच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक गटांकडून अयोध्या परिसरात काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्कतेचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षाव्यवस्थेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) आठ तुकड्यांची मागणी केली आहे. त्याचबरोबर रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ), सीआरपीएफच्या दोन तुकड्याही येथे तैनात करण्यात आल्या आहेत.