शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

'बाबरी मशीद पुन्हा बांधा', उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये झळकले पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 14:25 IST

उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मेरठमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

लखनऊ- बाबरी मशीद विध्वंसाच्या घटनेला आज 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्षांनंतर आज म्हणजेच बुधवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला मंगळवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मेरठमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोस्टर लावण्याच्या मागे याच संघटनेचा हात असल्याचं बोललं जातं आहे. 

 

पोस्टरनुसार या आंदोलनाची चिथावणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) दिली जाते आहे. 'हम भूल न जाएं, धोखे के 25 साल, बाबरी मस्जिद की दोबारा तामीर करो।', असं पोस्टरवर नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ, गाझियाबाद, अलीगढ, हाथरस आणि सहारनपूरमधील शहरात आंदोलनाचे पोस्टर्स लावण्यात आल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पीएफआय पश्चिम यूपीतील काही लोकांना एकत्र करून दिल्लीत आंदोलन करण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हंटलं आहे.

बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा बजरंग दल आणि शिवसेनेने केली आहे. या दिवशी नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच, अशांतता पसरवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने संशयित हालचालींवर करडी नजर ठेवण्याचं आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्थाबाबरी मशीद विध्वंसाच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक गटांकडून अयोध्या परिसरात काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्कतेचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षाव्यवस्थेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) आठ तुकड्यांची मागणी केली आहे. त्याचबरोबर रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ), सीआरपीएफच्या दोन तुकड्याही येथे तैनात करण्यात आल्या आहेत.