शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

'बाबरी मशीद पुन्हा बांधा', उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये झळकले पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 14:25 IST

उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मेरठमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

लखनऊ- बाबरी मशीद विध्वंसाच्या घटनेला आज 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्षांनंतर आज म्हणजेच बुधवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला मंगळवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मेरठमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोस्टर लावण्याच्या मागे याच संघटनेचा हात असल्याचं बोललं जातं आहे. 

 

पोस्टरनुसार या आंदोलनाची चिथावणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) दिली जाते आहे. 'हम भूल न जाएं, धोखे के 25 साल, बाबरी मस्जिद की दोबारा तामीर करो।', असं पोस्टरवर नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ, गाझियाबाद, अलीगढ, हाथरस आणि सहारनपूरमधील शहरात आंदोलनाचे पोस्टर्स लावण्यात आल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पीएफआय पश्चिम यूपीतील काही लोकांना एकत्र करून दिल्लीत आंदोलन करण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हंटलं आहे.

बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा बजरंग दल आणि शिवसेनेने केली आहे. या दिवशी नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच, अशांतता पसरवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने संशयित हालचालींवर करडी नजर ठेवण्याचं आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्थाबाबरी मशीद विध्वंसाच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक गटांकडून अयोध्या परिसरात काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्कतेचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षाव्यवस्थेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) आठ तुकड्यांची मागणी केली आहे. त्याचबरोबर रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ), सीआरपीएफच्या दोन तुकड्याही येथे तैनात करण्यात आल्या आहेत.