शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

समाजाने दुष्काळग्रस्तांना बळ द्यावे बाबासाहेब पुरंदरे : साहित्य प्रसार केंद्राच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिपादन

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

नाशिक : दुष्काळग्रस्तांविषयी सहानुभूती दाखविली पाहिजे; मात्र केवळ दया करून चालणार नाही तर दुष्काळग्रस्तांच्या मनात पुन्हा जिद्द निर्माण करण्यासाठी समाजाने त्यांना आशावादाचे बळ देणेही तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.

नाशिक : दुष्काळग्रस्तांविषयी सहानुभूती दाखविली पाहिजे; मात्र केवळ दया करून चालणार नाही तर दुष्काळग्रस्तांच्या मनात पुन्हा जिद्द निर्माण करण्यासाठी समाजाने त्यांना आशावादाचे बळ देणेही तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरंदरे बोलत होते. व्यासपीठावर डॉ. गो. ह. देशपांडे, कार्याध्यक्ष अनिल भालेराव, मकरंद कुलकर्णी, रोहिणी बलंग आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, पुरंदरे यांनी तरुणपिढीचा चंगळवाद आणि सामाजिक बांधिलकीविषयी असलेल्या त्यांच्या उदासीन भूमिकेवर टीका केली. तरुणांनी केवळ सोशल मीडिया किंवा सिनेमागृहामध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालविण्यापेक्षा समाजसेवेचे कार्य निष्कामपणे पार पाडावे, असे यावेळी आवाहन केले. ते पुढे म्हणाले, सध्या महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुष्काळ निवारणाचे व्यवस्थापन आणि त्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीत गोरगरीब जनतेसाठी आशेचे किरण ठरतील अशा आखलेल्या विविध योजनांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. महाराजांच्या जन्माच्या वेळी दोन वर्षे दुष्काळाची स्थिती होती. महाराजांना हे आई जिजाऊने जेव्हा सांगितले तेव्हा महाराजांनी दुष्काळाशी लढा देण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यांची दूरदृष्टी, उत्तम व्यवस्थापन, संवेदनशीलता शिकण्यासारखी आहे. आजच्या तरुणपिढीने त्यांच्या इतिहासातून हे धडे घेण्यासारखे असून, केवळ जयजयकार आणि जयंतीदिनी शहरातून दुचाकीवरून मिरविण्यापेक्षा शिवरायांनी जनहिताचे केलेले कार्य अभ्यासून त्यामधून प्रेरणा घेण्याची खरी गरज आहे, असे पुरंदरे यावेळी म्हणाले. प्रास्ताविक ज्योती अष्टपुत्रे यांनी केले व आभार मकरंद कुलकर्णी यांनी मानले.
इन्फो.........
यांच्या कार्याचा सन्मान
रुग्णसेवेचे व्रत निष्ठेने जोपासणारे डॉ. यशवंत बर्वे यांना जीवनगौरव (सन्मानपत्र, अकरा हजारांचा धनादेश) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बर्वे यांनी पुन्हा संस्थेला सामाजिक कार्यासाठी धनादेश प्रदान केला. सेवानिवृत्तीनंतरही गोरगरिबांना शिक्षण देण्याचे कार्य करणार्‍या कुसुम बुरकुले, आदिवासी भागांमध्ये जाऊन तेथील गोरगरीब कुटुंबांना वैद्यकीय सेवा देणार्‍या शकुंतला मांकड, कुमुदिनी फेगडे, स्वाती वानखेडे यांना सन्मानपत्र व प्रत्येकी अनुक्रमे अडीच हजार, पाच हजार तर अन्य पुरस्कारार्थींना सन्मानपत्र व ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.