शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
3
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
4
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
5
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
6
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
7
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
8
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
9
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
10
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
11
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
12
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
14
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
15
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
16
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
17
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
18
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
19
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
20
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'

समाजाने दुष्काळग्रस्तांना बळ द्यावे बाबासाहेब पुरंदरे : साहित्य प्रसार केंद्राच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिपादन

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

नाशिक : दुष्काळग्रस्तांविषयी सहानुभूती दाखविली पाहिजे; मात्र केवळ दया करून चालणार नाही तर दुष्काळग्रस्तांच्या मनात पुन्हा जिद्द निर्माण करण्यासाठी समाजाने त्यांना आशावादाचे बळ देणेही तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.

नाशिक : दुष्काळग्रस्तांविषयी सहानुभूती दाखविली पाहिजे; मात्र केवळ दया करून चालणार नाही तर दुष्काळग्रस्तांच्या मनात पुन्हा जिद्द निर्माण करण्यासाठी समाजाने त्यांना आशावादाचे बळ देणेही तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरंदरे बोलत होते. व्यासपीठावर डॉ. गो. ह. देशपांडे, कार्याध्यक्ष अनिल भालेराव, मकरंद कुलकर्णी, रोहिणी बलंग आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, पुरंदरे यांनी तरुणपिढीचा चंगळवाद आणि सामाजिक बांधिलकीविषयी असलेल्या त्यांच्या उदासीन भूमिकेवर टीका केली. तरुणांनी केवळ सोशल मीडिया किंवा सिनेमागृहामध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालविण्यापेक्षा समाजसेवेचे कार्य निष्कामपणे पार पाडावे, असे यावेळी आवाहन केले. ते पुढे म्हणाले, सध्या महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुष्काळ निवारणाचे व्यवस्थापन आणि त्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीत गोरगरीब जनतेसाठी आशेचे किरण ठरतील अशा आखलेल्या विविध योजनांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. महाराजांच्या जन्माच्या वेळी दोन वर्षे दुष्काळाची स्थिती होती. महाराजांना हे आई जिजाऊने जेव्हा सांगितले तेव्हा महाराजांनी दुष्काळाशी लढा देण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यांची दूरदृष्टी, उत्तम व्यवस्थापन, संवेदनशीलता शिकण्यासारखी आहे. आजच्या तरुणपिढीने त्यांच्या इतिहासातून हे धडे घेण्यासारखे असून, केवळ जयजयकार आणि जयंतीदिनी शहरातून दुचाकीवरून मिरविण्यापेक्षा शिवरायांनी जनहिताचे केलेले कार्य अभ्यासून त्यामधून प्रेरणा घेण्याची खरी गरज आहे, असे पुरंदरे यावेळी म्हणाले. प्रास्ताविक ज्योती अष्टपुत्रे यांनी केले व आभार मकरंद कुलकर्णी यांनी मानले.
इन्फो.........
यांच्या कार्याचा सन्मान
रुग्णसेवेचे व्रत निष्ठेने जोपासणारे डॉ. यशवंत बर्वे यांना जीवनगौरव (सन्मानपत्र, अकरा हजारांचा धनादेश) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बर्वे यांनी पुन्हा संस्थेला सामाजिक कार्यासाठी धनादेश प्रदान केला. सेवानिवृत्तीनंतरही गोरगरिबांना शिक्षण देण्याचे कार्य करणार्‍या कुसुम बुरकुले, आदिवासी भागांमध्ये जाऊन तेथील गोरगरीब कुटुंबांना वैद्यकीय सेवा देणार्‍या शकुंतला मांकड, कुमुदिनी फेगडे, स्वाती वानखेडे यांना सन्मानपत्र व प्रत्येकी अनुक्रमे अडीच हजार, पाच हजार तर अन्य पुरस्कारार्थींना सन्मानपत्र व ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.