शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

बाबांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा!

By admin | Updated: October 6, 2014 04:25 IST

निवडणूक असो वा नसो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दिवस पहाटे ६ ला सुरू होतो. थोडाफार व्यायाम अन् तयार झालेत की ते सकाळी आठ-साडेआठला कामाला लागतात ते थेट रात्री २ पर्यंत

यदु जोशी, मुंबईनिवडणूक असो वा नसो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दिवस पहाटे ६ ला सुरू होतो. थोडाफार व्यायाम अन् तयार झालेत की ते सकाळी आठ-साडेआठला कामाला लागतात ते थेट रात्री २ पर्यंत. वय आहे फक्त ६८. सध्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांच्यातील उत्साह तिशीतल्या तरुणाला लाजवेल असा आहे. काँग्रेस त्यांच्या नेतृत्वात लढत असल्याने उद्या ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील.स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा वस्तुपाठ ठरलेल्या पृथ्वीराजबाबांसोबत प्रचाराच्या निमित्ताने शनिवारी एक दिवस घालवता आला. ते स्वत: दक्षिण कऱ्हाडमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कऱ्हाडमधील पाटण ्रकॉलनीतील त्यांच्या बंगल्यावर सकाळी ७ पासूनच गाठीभेटी सुरू झाल्या. तीन तासांनी त्यांना राज्यातील प्रचारसभांसाठी कऱ्हाड सोडायचे होते. त्यापूर्वीे खास विश्वासू माणसांशी चर्चा त्यांनी चर्चा केली. लहानमोठ्या संघटना, काँग्रेसच्या फ्रंटल संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी बोलले.बऱ्याच नेत्यांकडे असा दरबार भरला की नेत्याच्या आणि गर्दीच्याही बोलण्यात एक प्रकारची गुर्मी, विरोधकांना निपटून घेण्याची भाषा असते. बाबांच्या बंगल्यावर असले काही चालत नाही. ‘आपण कऱ्हाडसाठी काय चांगलं केलं तेवढ सांगा, पॉझिटीव्ह प्रचार करा’, हे समजवण्यावर त्यांचा भर असतो. प्रचार यंत्रणा दिवसभर कुठे, कशी राबवायची याची मुख्यत्वे चर्चा होते. आलेल्या कार्यकर्त्यांच्या चहानाश्त्याची काळजी चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला करीत असतात. कऱ्हाडच्या गजानन हॉटेलमधील मिसळ पाव खायला गेलो. तिथे लोक सध्याच्या राजकारणावर बोलले.‘बाबा भला माणूस आहे पण काका बी तितकाच भला आहे’, असे त्यांचे मत. सातवेळा आमदार असलेले विलासकाका उंडाळकर आणि पृथ्वाराज बाबा अशा दोन भल्या माणसांमधील टक्कर सध्या कऱ्हाड अनुभवतेय. बाबांना मत देणार की काकांना हे लोक स्पष्टपणे सांगतात पण कोणीतरी एक भला माणूस हरणार याची बोचही बोलण्यात असते.मनात विचार येतो अशी सगळीकडेच भल्या माणसांमध्ये लढत व्हायला हवी. लोकसभेच्या एका निवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. ‘मी जिंकलो याचा आनंद मला आहे पण माझ्यापेक्षा जास्त योग्यतेचा माणूस हरला याचे दु:ख अधिक आहे’, ही श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया होती. या निमित्ताने त्या प्रतिक्रियेचे स्मरण होते.चव्हाण १० च्या सुमारास कऱ्हाडच्या धावपट्टीवर पोहोचतात. छोटेखानी विमान तयार असते. पायलटची ते आस्थेने विचारपूस करतात. विदर्भातील प्रचारसभांसाठी विमानाने अकोल्याला रवाना होतात. तिथून पुढे हेलिकॉप्टरने प्रवास सुरू होतो. हेलिकॉप्टरमधून खाली डोकावताना,विदर्भाची शेती सुपीक असूनही इथल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते याचे शल्य ते बोलून दाखवतात. विदर्भात उद्योग नाहीत. सगळा औद्योगिक विकास पुणे, मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये झाला. विकेंद्रीकरण व्हायला हवे होते. म्हणूनच मी नवे औद्योगिक धोरण आणले. आता हळुहळु त्याचे परिणाम दिसतील. पण तेवढे पुरेसे नाही. येथे लघु उद्योगांना प्रचंड बळ देण्याची गरज आहे आणि इथली शेती तितक्याच नफ्याची करणे आवश्यक आहे. म्हणूनच मी शाश्वत शेतीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. पुढच्या पाच वर्षांसाठी सत्ता मिळाली तर या दोन वरील तिन्ही विषयांना माझे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे ते सांगतात. मी पश्चिम महाराष्ट्रातील आहे म्हणून बोलत नाही पण विदर्भातील नेत्यांनी वेळोवेळी इच्छाशक्ती दाखविली नाही, अशी खंतही व्यक्त करतात.