शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

मोदींच्या हस्तक्षेपाची आझाद यांची मागणी

By admin | Updated: December 25, 2015 00:54 IST

दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराचा(डीडीसीए) मुद्दा उपस्थित केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी मी काय चूक केली ते सांगा?

नवी दिल्ली : दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराचा(डीडीसीए) मुद्दा उपस्थित केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी मी काय चूक केली ते सांगा? असा थेट सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा यांनी गुरुवारी बैठक घेत आझाद यांचे निलंबन आणि पक्षनेतृत्वासंबंधी मुद्यांवर चर्चा केली. पक्षातील बुजुर्ग नेते पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत त्यातून मिळाले आहेत.माझा लढा डीडीसीएमधील भ्रष्टाचाराशी आहे. वैयक्तिक पातळीवर कुणाशीही नाही, असे बिहारमधील दरभंगा येथील खासदार असलेल्या आझाद यांनी अहमदाबाद येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाच्या निगराणीखाली तपासाची मागणी करण्याचे संकेतही दिले आहेत. पंतप्रधान माझी विनंती ऐकून घेतील अशी आशा आहे. पक्षातील ज्येष्ठांचा समावेश असलेल्या मार्गदर्शक मंडळानेही समोर येत या मुद्याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या आझाद यांच्याविरुद्ध भाजपने बुधवारी निलंबनाचा व्हीप जारी करताच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जेटलींची प्रतिष्ठा घालवण्यासाठी आझाद यांनी काँग्रेस आणि आपशी हातमिळवणी केल्याचा आरोप होत आहे. मला पक्षाकडून निलंबनाची नोटीस मिळाली असली तरी विशिष्ट कारणे स्पष्ट केलेली नाहीत. मी पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलो आहे असे म्हणायचे आहे काय? माझा नेमका दोष काय? मी पक्षाविरुद्ध काहीही केलेले नाही. मी केवळ डीडीसीएमधील भ्रष्टाचाराबद्दल बोललो. मोदी माझी विनंती ऐकून घेतील आणि मला न्याय देतील, अशी मला आशा आहे, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे आझाद म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)> मी काय चूक केली याचे उत्तर हवे आहे...भाजप आणि रा.स्व. संघाने नेहमीच भ्रष्टाचार उखडून टाकण्याची भाषा केली आहे. महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालण्याबाबत आम्ही बोलतो. त्यामुळेच या मुद्यावर मी मोदींच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या खोलात जावे. मी काय चूक केली याचे विशिष्ट असे उत्तर हवे आहे, असेही त्यांनी नमूद केले. गुरुवारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आझाद यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.... तर सीबीआयची पंचाईत होईलडीडीसीएला नोटीस जारी करू नये. अशा नोटिसीनंतर फाईल गहाळ होतात. उद्या मला न्यायालयीन निगराणीत तपासाची मागणी करण्यासाठी न्यायालयात जायचे झाल्यास, सीबीआयची पंचाईत होईल, असे सांगत आझाद यांनी फायली गहाळ होण्याच्या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मला निलंबनाच्या नोटिसीबाबत उत्तर सादर करण्यासाठी मदतीची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अडवाणी गटाची बैठकबिहारमधील पराभवानंतर अडवाणी गटाने १० नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला निवेदन जारी करीत पक्षातील असंतोषाला तोंड फोडले होते. गुरुवारी या गटाने घेतलेल्या बैठकीनंतर कोणतेही निवेदन किंवा जाहीर भाष्य केलेले नाही. याउलट योग्य वेळी, योग्य व्यासपीठावर हा मुद्दा मांडला जाईल असे स्पष्ट केले. जेटलींसंबंधी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चा झाली काय? या प्रश्नावर एका ज्येष्ठ नेत्याने ‘अर्थातच’ एवढे उत्तर देत पार्श्वभूमीकडे अंगुलीनिर्देश केला. अडवाणी, शांता कुमार आणि यशवंत सिन्हा यांनी मुरलीमनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जवळजवळ तासभर चर्चा केली. आम्ही भेटलो, चहा घेतला असे सांगत शांताकुमार यांनी भाष्य टाळले. बिहारमधील पराभवानंतर या चार नेत्यांनी मोदी आणि शहा या जोडगोळीवर थेट हल्ला करीत पराभवाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारे निवेदन जारी केले होते.आझाद यांच्या निलंबनावरून मोदींवर टीकालखनौ : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) मधील घोटाळ्यावरून वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्ध मोहीम उघडणारे भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रखर टीका केली आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा,’ या मोदी यांच्या निवडणूक नाऱ्याचे त्यांना स्मरण करून देत, डीडीसीए घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली.‘निवडणूक प्रचारात मोदी भ्रष्टाचार व घोटाळ्यांबद्दल बोलले. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे ते वारंवार सांगत होते; पण आता घोटाळे घडत आहेत आणि नुकताच डीडीसीए घोटाळा घडला आहे. या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्या खासदाराला निलंबित करण्यात आले आहे,’ असे राहुल म्हणाले. अमेठीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून दिल्लीला परतताना ते लखनौ येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा, असे सांगणारे मोदी आज मौन पाळून आहेत. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होऊ लागला आहे, असेही ते म्हणाले.मोदींनी कारवाई केली पाहिजे आणि जेटली हे १३ वर्षांपर्यंत अध्यक्ष राहिलेल्या डीडीसीएतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले पाहिजेत, असे राहुल गांधी म्हणाले.राहुल गांधी यांनी वाढत्या महागाईवरून मोदींवर टीकास्त्र सोडले. महागाई वाढत असताना मोदी वारंवार परदेश दौरा करतात. या दौऱ्याने देशाचा कोणता फायदा होणार, असा सवाल त्यांनी केला. (वृत्तसंस्था)