शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

प्राणप्रतिष्ठेला महिना पूर्ण, अयोध्येत भाविकांचा महासागर; ३० दिवसांत ६२ लाख जणांचे रामदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 19:19 IST

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू झाले असून, येथे सात देवतांची स्थापना केली जाणार आहे.

Ayodhya Ram Mandir: बालरुपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. दररोज लाखो भक्त रामदर्शन घेत आहेत. तर दानधर्मही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता जवळपास एक महिना झाला आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे ६२ लाख भाविकांनी अयोध्येत येऊन रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. 

अयोध्या रामनगरीत ही भक्ती, ज्ञान आणि कर्माचा त्रिवेणी संगम पाहायला मिळत आहे. भव्य आणि दिव्य राम मंदिरात श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा महासागर लोटत आहे. आस्था ट्रेनमधून दररोज जवळपास १० ते १५ हजार भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. भाविकांना अनेक किलोमीटर पायी प्रवास करत राम मंदिराकडे जावे लागत आहे. अजूनही अनेक सुविधांची अभाव आहे. असे असूनही भाविकांचा रामदर्शनाचा उत्साह तसूभरही कमी होताना दिसत नाही. 

भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे

अयोध्येत येणाऱ्या भाविकांचा उत्साह अगदी पाहण्यासारखा आहे. गर्दी कमी होऊन मग रामदर्शनासाठी जाऊ, अशी वाट भाविक पाहताना दिसत नाहीत. रामललाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक येत आहेत. सर्वांना रामदर्शनाची उत्सुकता आहे. अयोध्येतील राम मंदिर इतर मंदिरांच्या तुलनेत कसे आहे, हे पाहण्यासाठीही लोक दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत यावे लागत आहे. असे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. दर्शन घेताच चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असतो. रामललाचे दर्शन घेतल्यानंतर ज्येष्ठांच्या डोळ्यात पाणी तरळते. आनंदाश्रूंसह ते बाहेर येतात. भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे, अशी प्रतिक्रिया श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा यांनी दिली आहे. 

दरम्यान, २३ जानेवारी रोजी एकाच दिवशी सर्वाधिक भाविकांनी रामदर्शन घेतले होते. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील कामे जवळपास पूर्ण झाली असून, आता दुसऱ्या मजल्याचे काम सुरू झाले आहे. संपूर्ण मंदिर तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यानंतर राम मंदिराचे भव्य रूप समोर येईल. राम मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठीचा मार्ग गोलाकार करण्यात आला आहे. दुसऱ्या मजल्यावर सात देवतांची स्थापना केली जाणार आहेत. ज्यामध्ये श्रीविष्णू, शिव, ब्रह्मा, गणेश, हनुमान, माता दुर्गा आणि सरस्वती यांच्या मूर्ती स्थापन करण्यात येणार आहेत. यासोबतच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे नक्षीकामही पाहायला मिळणार आहे. सध्या मंदिरात एक मुख्य शिखर आणि पाच उपशिखर बांधण्यात येणार आहेत. मुख्य शिखराचे बांधकाम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर