शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

३२४० जणांचा अर्ज, २४ जणांची निवड; ३ महिन्याचे प्रशिक्षण, राम मंदिरात योग्यतेनुसार पुजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 09:39 IST

Ayodhya Ram Mandir News: मुलाखतींच्या तीन फेऱ्या आणि १४ प्रश्न यातून या २४ जणांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Ayodhya Ram Mandir News ( Marathi News ): २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू असून, स्थापन होणाऱ्या मूर्ती निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच राम मंदिरात २४ पुजारी असणार आहेत. या सर्वांना ३ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तब्बल ३ हजार २४० जणांमधून २४ जण निवडण्यात आले आहेत.

राम मंदिराचे महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि महंत सत्यनारायण दास मंदिरातील पूजा करण्यासाठी पौरोहित्य आणि कर्मकांडाचे प्रशिक्षण देत आहेत. या पुजाऱ्यांच्या निवडीतून सामाजिक समरसतेचा संदेश देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पुरोहितांची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली आहे. ‘हरि का भजे सो हरि का होई’यानुसार समाजाला नवा संदेश देण्यासाठी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हा उपक्रम हाती घेतला आहे, जाती-पातीवरून नाही, तर योग्यतेवरून राम मंदिरासाठी पुजाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

कठोर प्रशिक्षण, मोबाइल वापरावर बंदी

रामानंदी परंपरेनुसार सर्व पुजाऱ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या काळात हे सर्व जण गुरुकुलचे नियम पाळत आहेत. निवड करण्यात आलेल्यांपैकी कोणीही मोबाईल वापरू शकत नाही आणि कोणीही बाहेरच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकत नाही. तीन टप्प्यांत घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यात संध्यावंदन, नाम, गोत्र, शक, प्रवरा यानुसार प्रश्न विचारण्यात आले. तर, दुसऱ्या टप्प्यात आचार्यांच्या पदवीनुसार प्रश्न विचारण्यात आले. श्रीरामांची उपासना पद्धत, ध्यान मंत्र, सीता मातेचा ध्यान मंत्र, भरताचा ध्यान मंत्र. हनुमंतांचा वैदिक ध्यान मंत्र तसेच श्रीरामांचा जन्म कोणत्या लग्नी झाला, अशा काही गोष्टी विचारण्यात आल्या.

१४ प्रश्न आणि २५ जणांची निवड

राम मंदिरासाठी पुजाऱ्यांची निवड करताना १४ प्रश्न विचारण्यात आले. या सर्वांची योग्य उत्तरे दिलेल्या २४ पुरोहितांची निवड करण्यात आली. मुलाखतीच्या तीन फेऱ्यांनंतर ३२४० उमेदवारांपैकी २५ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यापैकी एक आचार्य दैवज्ञ कृष्ण शास्त्री यांनी आपले नाव मागे घेतले. आचार्य शास्त्री यांच्या मते, शेवटच्या फेरीतील तीन प्रश्न अत्यंत कठीण होते. हनुमानजींचे वैदिक ध्यान मंत्र, सीता मातेचे ध्यान मंत्र आणि भरतजींचे ध्यान मंत्र, याकडे सर्वसाधारणपणे लक्ष दिले जात नाही.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर