शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अयोध्या प्रकरण :मध्यस्थी करणारे रविशंकर कोण ? भाजपचे माजी खासदार वेदांती यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:22 IST

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थी करण्याच्या दाखवलेल्या तयारीबद्दल भाजपचे माजी खासदार राम विलास वेदांती यांनी गुरुवारी प्रश्न उपस्थित केला.

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थी करण्याच्या दाखवलेल्या तयारीबद्दल भाजपचे माजी खासदार राम विलास वेदांती यांनी गुरुवारी प्रश्न उपस्थित केला. रविशंकर यांनी गोळा केलेल्या अमाप संपत्तीची चौकशी होऊ नये यासाठीच त्यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप वेदांती यांनी केला.अयोध्येतील वादाशी संबंधित असलेल्या पक्षांची अयोध्येत गुरुवारी भेट घेण्याचे रविशंकर यांनी ठरवले असतानाच वेदांती यांनी वरील भाष्य केले. वेदांती म्हणाले की, वादात मध्यस्थी करणारे रविशंकर कोण आहेत? त्यांनी त्यांची स्वयंसेवी संस्था चालवावी व विदेशी निधी ढिगाने गोळा करावा. त्यांनी प्रचंड संपत्ती गोळा केली असून, तिची चौकशी टाळण्यासाठीच त्यांनी राम मंदिर प्रश्नात उडी घेतली आहे.मला ऐक्य हवे आहे, मला सलोखा हवा आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. आम्ही सगळ्यांशी बोलू, असे रविशंकर यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल बुधवारी म्हटले होते.रविशंकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बुधवारी सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना रविशंकर म्हणाले की, या वादात सरकार पक्षकार नसल्यामुळे मी संबंधित बाजूंना आधीच सांगितले आहे की संवादाच्या माध्यमातून तुम्ही अंतिम निर्णय घेऊन येणार असाल तर त्याला पाठिंबा द्यायला सरकार पूणपणे बांधील आहे.जर ते निर्णयापर्यंत येऊ शकत नसतील तर प्रकरण न्यायालयात आहेच आणि तेथे जो निर्णय होईल तो सरकार पालन करील.विहिंपनेही केला आहे विरोध...वेदांती हे राम मंदिर चळवळीशी संबंधित असून, यापूर्वीही रविशंकर यांनी मध्यस्थीची दाखवलेली तयारी त्यांनी फेटाळून लावली होती. रविशंकर यांनी मध्यस्थीच्या दाखवलेल्या तयारीला आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि विश्व हिंदू परिषदेनेही विरोध केलेला आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर