शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

अयोध्या : तब्बल 500 वर्षांनी क्षत्रिय कुटुंबांनी पगडी, चामड्याची चप्पल घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 11:34 IST

अयोध्येच्या बाजुलाच असलेल्या पूरा बाजार ब्लॉक आणि आसपासच्या 105 गावांतील सूर्यवंशी क्षत्रिय समाज राहतो.

लखनऊ : सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात अयोध्येतील राम मंदिर बाबत निकाल जाहीर केला. यामुळे राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साऱ्या देशाने हा निकाल सकारात्मक दृष्टीने स्वीकारला आहे. याच बरोबर एका मोठ्या समाजाचा तब्बल 500 वर्षांपूर्वीचा संकल्प पूर्ण झाला आहे. 

अयोध्येच्या बाजुलाच असलेल्या पूरा बाजार ब्लॉक आणि आसपासच्या 105 गावांतील सूर्यवंशी क्षत्रिय समाज तब्बल 500 वर्षांनी पगडी बांधणार आहे. तसेच पायात चामड्याची चप्पल घालणार आहे. कारण राम मंदिराच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण होणार आहे. या गावांतील क्षत्रिय समाजाच्या नागरिकांना पगड्या वाटल्या जात आहेत. सूर्यवंशी समाजाच्या पूर्वजांनी जेव्हा मंदिरावर हल्ला झाला होता तेव्हा शपथ घेतली होती. जोपर्यंत मंदिर पुन्हा बांधले जात नाही तोपर्यंत डोक्यावर पगडी आणि पायात चप्पल घालणार नाही. याचबरोबर छत्रीने डोके झाकणार नाही. 

सूर्यवंशी क्षत्रिय परिवार अयोध्या जिल्ह्याच्या 105 गावांमध्ये राहतात. हे सर्व ठाकूर परिवार भगवान रामाचे वंशज असल्याचे मानतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या गावांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. सराय़रासीच्या न्यायालयात वकील असलेल्या बासदेव सिंह यांनी सांगितले की न्य़ायालयात आतापर्यंत 400 पगड्यांचे वाटप करण्यात आले आहे. या समाजाचे जवळपास दीड लाख लोक आहेत. त्यांनी गेली अनेक पिढ्या पगडी बांधलेली नाही.

लग्नावेळीही डोके उघडे ठेवून कापड गुंडाळले जात होते. त्यांच्या पूर्वजांनी चप्पल सोडण्याचा संकल्प केलेला तेव्हा चामड्याची पादत्राने मिळत होती. यामुळे या लोकांनी कधीच चामड्याचे चप्पल घातले नाही. आता या भागात चामड्याच्या चप्पलाची मागणी वाढली आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय