शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या : तब्बल 500 वर्षांनी क्षत्रिय कुटुंबांनी पगडी, चामड्याची चप्पल घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 11:34 IST

अयोध्येच्या बाजुलाच असलेल्या पूरा बाजार ब्लॉक आणि आसपासच्या 105 गावांतील सूर्यवंशी क्षत्रिय समाज राहतो.

लखनऊ : सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात अयोध्येतील राम मंदिर बाबत निकाल जाहीर केला. यामुळे राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साऱ्या देशाने हा निकाल सकारात्मक दृष्टीने स्वीकारला आहे. याच बरोबर एका मोठ्या समाजाचा तब्बल 500 वर्षांपूर्वीचा संकल्प पूर्ण झाला आहे. 

अयोध्येच्या बाजुलाच असलेल्या पूरा बाजार ब्लॉक आणि आसपासच्या 105 गावांतील सूर्यवंशी क्षत्रिय समाज तब्बल 500 वर्षांनी पगडी बांधणार आहे. तसेच पायात चामड्याची चप्पल घालणार आहे. कारण राम मंदिराच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण होणार आहे. या गावांतील क्षत्रिय समाजाच्या नागरिकांना पगड्या वाटल्या जात आहेत. सूर्यवंशी समाजाच्या पूर्वजांनी जेव्हा मंदिरावर हल्ला झाला होता तेव्हा शपथ घेतली होती. जोपर्यंत मंदिर पुन्हा बांधले जात नाही तोपर्यंत डोक्यावर पगडी आणि पायात चप्पल घालणार नाही. याचबरोबर छत्रीने डोके झाकणार नाही. 

सूर्यवंशी क्षत्रिय परिवार अयोध्या जिल्ह्याच्या 105 गावांमध्ये राहतात. हे सर्व ठाकूर परिवार भगवान रामाचे वंशज असल्याचे मानतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या गावांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. सराय़रासीच्या न्यायालयात वकील असलेल्या बासदेव सिंह यांनी सांगितले की न्य़ायालयात आतापर्यंत 400 पगड्यांचे वाटप करण्यात आले आहे. या समाजाचे जवळपास दीड लाख लोक आहेत. त्यांनी गेली अनेक पिढ्या पगडी बांधलेली नाही.

लग्नावेळीही डोके उघडे ठेवून कापड गुंडाळले जात होते. त्यांच्या पूर्वजांनी चप्पल सोडण्याचा संकल्प केलेला तेव्हा चामड्याची पादत्राने मिळत होती. यामुळे या लोकांनी कधीच चामड्याचे चप्पल घातले नाही. आता या भागात चामड्याच्या चप्पलाची मागणी वाढली आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय