शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

हिमस्खलनात पाच जवान शहीद; काश्मीर खोऱ्यात १० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 04:05 IST

बर्फवृष्टीने जम्मू-श्रीनगर महामार्गावर तीन हजार वाहने अडकली

श्रीनगर : काश्मीर खोºयातील बºयाच भागांत बर्फवृष्टीमुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले असून, सोमवारी रात्री खोºयात तीन ठिकाणी झालेल्या हिमस्खलनात १0 जण मरण पावले आहेत. मृतांमध्ये लष्कराचे चार जवान व बीएसएफचा एक जवान आणि पाच स्थानिक रहिवासीही आहेत. नौगाममध्येही बीएसएफचा एक जवान मरण पावला. त्याच्याबरोबर असलेल्या सहा जवानांची मात्र सुटका करण्यात आली.

माछिल क्षेत्रातील नियंत्रण रेषेपाशी सोमवारी रात्री हिमस्खलनात पाच जवान अडकले होते. त्यापैकी चौघे बर्फाखाली दबून मरण पावले, तर एकाची सुटका करण्यात आली. नौगाम भागातील नियंत्रण रेषेवरील हिमस्खलनात बीएसएफचे सात जवान अडकले होते. त्यापैकी एक जवान मरण पावला, तर सहा जवानांची सुटका करण्यात आली. गंदेरबल जिल्ह्यातही प्रचंड हिमस्खलन झाले. तिथे बर्फाच्या ढिगाºयाखाली ९ जण अडकले होते. त्यापैकी चार जणांची सुटका करण्यात आली. मात्र पाच स्थानिक मरण पावले.

जनजीवन विस्कळीतकाश्मीर खोºयाच्या बºयाच भागांत बर्फवृष्टीबरोबरच जोरदार पाऊसही सुरू आहे. प्रचंड धुके असून, त्याचा परिणाम विमानसेवेवर झाला. जम्मू-श्रीनगर मार्गावर बर्फवृष्टी, पाऊस व धुक्यामुळे तीन हजारांहून अधिक वाहने अडकून पडली आहेत. अनेक भागांत तापमान शून्याखाली आले आहे. मालवाहतूक करणारी वाहने न पोहोचल्याने अन्नधान्ये, भाज्या तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासत आहे. शाळा व महाविद्यालयांना अनेक ठिकाणी सुट्टी दिल आहे. खासगी, सरकारी कार्यालयांमध्येही उपस्थिती अत्यल्प होती. (वृत्तसंस्था)

लातूरचे जवान सुरेश चित्ते सियाचीनमध्ये शहीदआलमला (जि. लातूर) : औसा तालुक्यातील आलमला येथील जवान सुरेश गोरख चित्ते (३२) हे सियाचीन (जम्मू-काश्मीर) येथे कर्तव्य बजावत असताना मंगळवारी शहीद झाले. हे समजताच औसा तालुक्यावर शोककळा पसरली. सुरेश चित्ते लेह येथील सियाचीन भागात बटालियनमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. २००५मध्ये ते लष्करात भरती झाले. तब्बल १४ वर्षे ते सेवेत होते. वडिलांच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सुरेश यांनी दोन बहिणींचे लग्न केले. भावालाही आधार दिला. त्यांची केवळ १ वर्षे ५ महिने सेवा बाकी होती़ सहा वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर