शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

पोलीस बंदोबस्तात ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव

By admin | Updated: July 21, 2016 22:23 IST

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाही वाद झाला नाही. लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता.

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाही वाद झाला नाही. लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता.
बाजार समितीने सलग तीन दिवस काही खरेदीदारांनी गोंधळ घातल्याने व भाजी खरेदीदार महिलांना इतर खरेदीदार महिलांकडून मारहाण झाल्याने औद्योगिक वसाहत पोलिसांनी एक दंगा नियंत्रण पथकाचे वाहन आणि चार कर्मचारी नियुक्त केले होते.
पहाटेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस ॲड.हर्षल चौधरी, संजय घुगे, संभाजी सोनवणे, बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी आणि बाजार समितीचे १० ते १२ कर्मचारी लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी फळे व भाजीपाला मार्केट यार्डात पोहोचले. त्यापाठोपाठ पोलिसही आले.
सर्व प्रतिनिधींनी शेतकरी, अडतदार आणि किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार यांना काही तक्रार असेल तर ती सांगा, लागलीच ती सोडवू, लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडू द्या, असे आवाहन केले.
यानंतर लिलाव सुरू झाले. लिलाव प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत म्हणजेच दीत ते दोन तास शेतकरी व बाजार समितीचे प्रतिनिधी फळे व भाजीपाला मार्केट यार्डात उपस्थित होते.

पक्की बिले बंधनकारक
किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदारांना भाजीपाला खरेदीनंतर पक्की बिले देण्यात येत आहेत की नाही याची तपासणी बाजार समिती प्रशासनाने केली. तसेच माल विकल्यानंतर शेतकर्‍यांना पावती दिले जात आहे की नाही याची माहिती शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली. शेतकर्‍यांनी अडत देऊ नये, आपली लुबाडणूक होत असेल तर तक्रार करावी, असे आवाहन ॲड.हर्षल चौधरी, संजय घुगे आदींनी केले. गुरुवारी खरेदीदारांना अडतदारांनी पक्की बिले दिली. कुठलीही तक्रार आली नाही, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

सहा टक्के अडत घेतली
अडतदारांनी भाजीपाला खरेदीदारांकडून सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार समिती शुल्क घेतले. त्याबाबतची बिलेही हातोहात देण्याची व्यवस्था केली होती.

रोज असणार पथक
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये लिलाव सुरळीत पार पडावेत, शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविल्या जाव्यात यासाठी पुढील काहीदिवसरोज१०कर्मचार्‍यांचेपथकनियुक्तकेेलेजाणारअसल्याचीमाहितीदेण्यातआली.