शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
4
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
5
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
6
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
8
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
9
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
10
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
11
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
12
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
13
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
14
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
15
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
16
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
17
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
18
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
19
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
20
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 

पोलीस बंदोबस्तात ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव

By admin | Updated: July 21, 2016 22:23 IST

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाही वाद झाला नाही. लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता.

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाही वाद झाला नाही. लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता.
बाजार समितीने सलग तीन दिवस काही खरेदीदारांनी गोंधळ घातल्याने व भाजी खरेदीदार महिलांना इतर खरेदीदार महिलांकडून मारहाण झाल्याने औद्योगिक वसाहत पोलिसांनी एक दंगा नियंत्रण पथकाचे वाहन आणि चार कर्मचारी नियुक्त केले होते.
पहाटेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस ॲड.हर्षल चौधरी, संजय घुगे, संभाजी सोनवणे, बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी आणि बाजार समितीचे १० ते १२ कर्मचारी लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी फळे व भाजीपाला मार्केट यार्डात पोहोचले. त्यापाठोपाठ पोलिसही आले.
सर्व प्रतिनिधींनी शेतकरी, अडतदार आणि किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार यांना काही तक्रार असेल तर ती सांगा, लागलीच ती सोडवू, लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडू द्या, असे आवाहन केले.
यानंतर लिलाव सुरू झाले. लिलाव प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत म्हणजेच दीत ते दोन तास शेतकरी व बाजार समितीचे प्रतिनिधी फळे व भाजीपाला मार्केट यार्डात उपस्थित होते.

पक्की बिले बंधनकारक
किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदारांना भाजीपाला खरेदीनंतर पक्की बिले देण्यात येत आहेत की नाही याची तपासणी बाजार समिती प्रशासनाने केली. तसेच माल विकल्यानंतर शेतकर्‍यांना पावती दिले जात आहे की नाही याची माहिती शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली. शेतकर्‍यांनी अडत देऊ नये, आपली लुबाडणूक होत असेल तर तक्रार करावी, असे आवाहन ॲड.हर्षल चौधरी, संजय घुगे आदींनी केले. गुरुवारी खरेदीदारांना अडतदारांनी पक्की बिले दिली. कुठलीही तक्रार आली नाही, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

सहा टक्के अडत घेतली
अडतदारांनी भाजीपाला खरेदीदारांकडून सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार समिती शुल्क घेतले. त्याबाबतची बिलेही हातोहात देण्याची व्यवस्था केली होती.

रोज असणार पथक
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये लिलाव सुरळीत पार पडावेत, शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविल्या जाव्यात यासाठी पुढील काहीदिवसरोज१०कर्मचार्‍यांचेपथकनियुक्तकेेलेजाणारअसल्याचीमाहितीदेण्यातआली.