शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

पोलीस बंदोबस्तात ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव

By admin | Updated: July 21, 2016 22:23 IST

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाही वाद झाला नाही. लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता.

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाही वाद झाला नाही. लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात होता.
बाजार समितीने सलग तीन दिवस काही खरेदीदारांनी गोंधळ घातल्याने व भाजी खरेदीदार महिलांना इतर खरेदीदार महिलांकडून मारहाण झाल्याने औद्योगिक वसाहत पोलिसांनी एक दंगा नियंत्रण पथकाचे वाहन आणि चार कर्मचारी नियुक्त केले होते.
पहाटेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस ॲड.हर्षल चौधरी, संजय घुगे, संभाजी सोनवणे, बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी आणि बाजार समितीचे १० ते १२ कर्मचारी लिलाव सुरळीत व्हावेत यासाठी फळे व भाजीपाला मार्केट यार्डात पोहोचले. त्यापाठोपाठ पोलिसही आले.
सर्व प्रतिनिधींनी शेतकरी, अडतदार आणि किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार यांना काही तक्रार असेल तर ती सांगा, लागलीच ती सोडवू, लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडू द्या, असे आवाहन केले.
यानंतर लिलाव सुरू झाले. लिलाव प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत म्हणजेच दीत ते दोन तास शेतकरी व बाजार समितीचे प्रतिनिधी फळे व भाजीपाला मार्केट यार्डात उपस्थित होते.

पक्की बिले बंधनकारक
किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदारांना भाजीपाला खरेदीनंतर पक्की बिले देण्यात येत आहेत की नाही याची तपासणी बाजार समिती प्रशासनाने केली. तसेच माल विकल्यानंतर शेतकर्‍यांना पावती दिले जात आहे की नाही याची माहिती शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली. शेतकर्‍यांनी अडत देऊ नये, आपली लुबाडणूक होत असेल तर तक्रार करावी, असे आवाहन ॲड.हर्षल चौधरी, संजय घुगे आदींनी केले. गुरुवारी खरेदीदारांना अडतदारांनी पक्की बिले दिली. कुठलीही तक्रार आली नाही, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.

सहा टक्के अडत घेतली
अडतदारांनी भाजीपाला खरेदीदारांकडून सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार समिती शुल्क घेतले. त्याबाबतची बिलेही हातोहात देण्याची व्यवस्था केली होती.

रोज असणार पथक
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये लिलाव सुरळीत पार पडावेत, शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविल्या जाव्यात यासाठी पुढील काहीदिवसरोज१०कर्मचार्‍यांचेपथकनियुक्तकेेलेजाणारअसल्याचीमाहितीदेण्यातआली.