शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

समान नागरी कायद्याच्या वादापासून वाचण्याचा प्रयत्न; आदिवासीनंतर आता विवाह कायद्यातही हस्तक्षेप नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 08:26 IST

सरकार समान नागरी कायद्याच्या विरोधात अनेक राजकीय पक्ष, धर्मांचे लोक व सामाजिक संघटना कोर्टात जाण्याची तयारी करीत आहेत.

संजय शर्मानवी दिल्ली : समान नागरी कायद्यापासून आदिवासींना दूर ठेवण्याच्या निर्णयानंतर आता सर्व धर्मांच्या विवाह कायद्यांनाही समान नागरी कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवले जात आहे. विवाहाचे वय निश्चित केले जाईल व बहुविवाह रोखले जातील.

केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या नेतृत्वातील विधी मंत्रालय समान नागरी कायद्याचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी वेगाने कामाला लागला आहे. हा मसुदा २० जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवला जाणार आहे. मंत्रिमंडळाने मसुद्याला मंजुरी दिल्यानंतर ते संसदेत सादर केले जाईल.

सरकार समान नागरी कायद्याच्या विरोधात अनेक राजकीय पक्ष, धर्मांचे लोक व सामाजिक संघटना कोर्टात जाण्याची तयारी करीत आहेत. सर्वांत जास्त वाद विवाह कायद्याबाबत आहेत. सर्व धर्माच्या लोकांच्या वेगवेगळ्या विवाह कायदे परंपरा आहेत. यापासून दूर राहण्यासाठी सरकार आता विवाह कायद्यांना समान नागरी कायद्याच्या बाहेर ठेवण्याचा विचार करीत आहे. 

विधी आयोगाला सूचना पाठविण्याची कालमर्यादा समाप्तविधी आयोगाने समान नागरी कायद्यावर सर्वसामान्यांकडून मागितलेल्या सूचनांची कालमर्यादा शुक्रवारी समाप्त झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधी आयोगाकडे आतापर्यंत ४० लाखांपेक्षा जास्त सूचना प्राप्त झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाह कायद्यातील दुरुस्तीबाबत मुस्लीम संघटनांनंतर शिखांचाही प्रखर विरोध आहे. विधी तज्ज्ञांनी हिंदू विवाह अधिनियमातील मिताक्षर कायद्याचा हवाला देत म्हटले आहे की, ते लागू केले तर लाखो हिंदूंचा विवाह अवैध ठरणार आहे. मिताक्षर कायद्यानुसार हिंदूंमध्ये एका गोत्रात विवाह अवैध असेल. पित्याच्या पाच पिढ्या व मातेच्या तीन पिढ्यांमध्ये विवाह झाला तर तोही अवैध मानला जाईल. आदिवासींच्या परंपरा लक्षात घेऊन आदिवासींनाही या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात येणार आहे.