शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

सरदार पटेलांचे योगदान कमी दाखविण्याचा प्रयत्न झाला - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:15 IST

स्वातंत्र्यानंतर देशाची एकजूट करण्याचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान कमी करण्याचा आणि मिटविण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि सरकारांकडून झाला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काँग्रेसवर हल्ला चढविला.

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची एकजूट करण्याचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान कमी करण्याचा आणि मिटविण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि सरकारांकडून झाला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काँग्रेसवर हल्ला चढविला.पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून सुरु झालेल्या ‘रन फॉर यूनिटी’ला त्यांनी हिरवा झेंडा दाखविला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसद मार्ग स्थित सरदार पटेल यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण केली. मोदी म्हणाले, देशाच्या पहिल्या गृहमंत्र्यांचा मुत्सद्दीपणा आणि राजकीय कौशल्यामुळे देश एकजूट आहे.पटेलांना कमी महत्व देण्याचे प्रयत्न झाले. जेणेकरुन त्यांचे योगदान विसरले जावे. पण, सरदार हे सरदार आहेत. भलेही सरकार अथवा कोणता राजकीय पक्ष त्यांचे योगदान स्वीकार करो अथवा ना करो राष्ट्र आणि येथील तरुण त्यांना विसरु शकत नाहीत.देशासाठी पटेलांचे जे योगदान आहे त्याचा भारतातील तरुण सन्मान करतात. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आलेल्या संकटात सरदार पटेल यांनी देशाला वाचविले आणि देशाला एकजूट करण्यात सफलता मिळविली.ब्रिटीश सरकार भारताला लहान लहान राज्यात विघटित करु पाहत होते. पण, पटेल यांनी साम- दाम, दंड- भेद, राजनीती, कुटनीती यांचा उपयोग करुन एक राष्ट्र बनविण्यात ते यशस्वी झाले.‘रन फॉर यूनिटी’साठी कर्णम मल्लेश्वरी, दीपा करमारकर, सरदार सिंह आणि सुरेश रैना यांच्यासारख्या प्रख्यात खेळाडूंसह मोठ्या संख्येने लोकांनी कार्यक्रमात भाग घेतला. ‘रन फॉर यूनिटी’चा हा टप्पा दीड किमीचा म्हणजे इंडिया गेटपर्यंत होता.पटेलांच्या योगदानाला मान्यता मिळाली नाही : नायडूसरदार वल्लभभाई पटेल हे देशाला एका सूत्रात बांधणारे सूत्रधार होते. मात्र, त्यांच्या योगदानाला उपयुक्त मान्यता देण्यात आली नाही, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.नेहरु स्मारक संग्रहालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, सरदार पटेल यांचे योगदान दुर्लक्षित करण्यात आले. देशातील ५६० संस्थानांचे विलिनीकरण हा त्यांचा महत्वपूर्ण निर्णय होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी