शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

सरदार पटेलांचे योगदान कमी दाखविण्याचा प्रयत्न झाला - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:15 IST

स्वातंत्र्यानंतर देशाची एकजूट करण्याचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान कमी करण्याचा आणि मिटविण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि सरकारांकडून झाला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काँग्रेसवर हल्ला चढविला.

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची एकजूट करण्याचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान कमी करण्याचा आणि मिटविण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि सरकारांकडून झाला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काँग्रेसवर हल्ला चढविला.पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून सुरु झालेल्या ‘रन फॉर यूनिटी’ला त्यांनी हिरवा झेंडा दाखविला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसद मार्ग स्थित सरदार पटेल यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण केली. मोदी म्हणाले, देशाच्या पहिल्या गृहमंत्र्यांचा मुत्सद्दीपणा आणि राजकीय कौशल्यामुळे देश एकजूट आहे.पटेलांना कमी महत्व देण्याचे प्रयत्न झाले. जेणेकरुन त्यांचे योगदान विसरले जावे. पण, सरदार हे सरदार आहेत. भलेही सरकार अथवा कोणता राजकीय पक्ष त्यांचे योगदान स्वीकार करो अथवा ना करो राष्ट्र आणि येथील तरुण त्यांना विसरु शकत नाहीत.देशासाठी पटेलांचे जे योगदान आहे त्याचा भारतातील तरुण सन्मान करतात. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आलेल्या संकटात सरदार पटेल यांनी देशाला वाचविले आणि देशाला एकजूट करण्यात सफलता मिळविली.ब्रिटीश सरकार भारताला लहान लहान राज्यात विघटित करु पाहत होते. पण, पटेल यांनी साम- दाम, दंड- भेद, राजनीती, कुटनीती यांचा उपयोग करुन एक राष्ट्र बनविण्यात ते यशस्वी झाले.‘रन फॉर यूनिटी’साठी कर्णम मल्लेश्वरी, दीपा करमारकर, सरदार सिंह आणि सुरेश रैना यांच्यासारख्या प्रख्यात खेळाडूंसह मोठ्या संख्येने लोकांनी कार्यक्रमात भाग घेतला. ‘रन फॉर यूनिटी’चा हा टप्पा दीड किमीचा म्हणजे इंडिया गेटपर्यंत होता.पटेलांच्या योगदानाला मान्यता मिळाली नाही : नायडूसरदार वल्लभभाई पटेल हे देशाला एका सूत्रात बांधणारे सूत्रधार होते. मात्र, त्यांच्या योगदानाला उपयुक्त मान्यता देण्यात आली नाही, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.नेहरु स्मारक संग्रहालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, सरदार पटेल यांचे योगदान दुर्लक्षित करण्यात आले. देशातील ५६० संस्थानांचे विलिनीकरण हा त्यांचा महत्वपूर्ण निर्णय होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी