शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सरदार पटेलांचे योगदान कमी दाखविण्याचा प्रयत्न झाला - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:15 IST

स्वातंत्र्यानंतर देशाची एकजूट करण्याचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान कमी करण्याचा आणि मिटविण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि सरकारांकडून झाला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काँग्रेसवर हल्ला चढविला.

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची एकजूट करण्याचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान कमी करण्याचा आणि मिटविण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि सरकारांकडून झाला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काँग्रेसवर हल्ला चढविला.पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून सुरु झालेल्या ‘रन फॉर यूनिटी’ला त्यांनी हिरवा झेंडा दाखविला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसद मार्ग स्थित सरदार पटेल यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण केली. मोदी म्हणाले, देशाच्या पहिल्या गृहमंत्र्यांचा मुत्सद्दीपणा आणि राजकीय कौशल्यामुळे देश एकजूट आहे.पटेलांना कमी महत्व देण्याचे प्रयत्न झाले. जेणेकरुन त्यांचे योगदान विसरले जावे. पण, सरदार हे सरदार आहेत. भलेही सरकार अथवा कोणता राजकीय पक्ष त्यांचे योगदान स्वीकार करो अथवा ना करो राष्ट्र आणि येथील तरुण त्यांना विसरु शकत नाहीत.देशासाठी पटेलांचे जे योगदान आहे त्याचा भारतातील तरुण सन्मान करतात. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आलेल्या संकटात सरदार पटेल यांनी देशाला वाचविले आणि देशाला एकजूट करण्यात सफलता मिळविली.ब्रिटीश सरकार भारताला लहान लहान राज्यात विघटित करु पाहत होते. पण, पटेल यांनी साम- दाम, दंड- भेद, राजनीती, कुटनीती यांचा उपयोग करुन एक राष्ट्र बनविण्यात ते यशस्वी झाले.‘रन फॉर यूनिटी’साठी कर्णम मल्लेश्वरी, दीपा करमारकर, सरदार सिंह आणि सुरेश रैना यांच्यासारख्या प्रख्यात खेळाडूंसह मोठ्या संख्येने लोकांनी कार्यक्रमात भाग घेतला. ‘रन फॉर यूनिटी’चा हा टप्पा दीड किमीचा म्हणजे इंडिया गेटपर्यंत होता.पटेलांच्या योगदानाला मान्यता मिळाली नाही : नायडूसरदार वल्लभभाई पटेल हे देशाला एका सूत्रात बांधणारे सूत्रधार होते. मात्र, त्यांच्या योगदानाला उपयुक्त मान्यता देण्यात आली नाही, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.नेहरु स्मारक संग्रहालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, सरदार पटेल यांचे योगदान दुर्लक्षित करण्यात आले. देशातील ५६० संस्थानांचे विलिनीकरण हा त्यांचा महत्वपूर्ण निर्णय होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी