शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
2
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
3
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
4
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
5
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
6
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
7
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
8
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
9
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
10
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
11
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
12
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
13
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
14
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
15
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
16
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
17
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
18
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
20
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली

'मंदिरे अन् हिंदूंवर हल्ले...', बांग्लादेशबाबत एस जयशंकर यांनी संसदेला दिली महत्वाची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:47 IST

Bangladesh Crisis : 'शेख हसीना यांना सत्तेवरून हटवणे हाच आंदोलकांचा एकमेव अजेंडा होता.'

Bangladesh Protest : भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांग्लादेशातील बिघडलेल्या परिस्थितीबाबत राज्यसभेत निवेदन दिले आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. राज्यसभेत बोलताना परराष्ट्र मंत्र्यांनी मंगळवारी (6 ऑगस्ट) सांगितले की, जानेवारी 2024 मध्ये झालेल्या निवडणुकांपासून बांग्लादेशात तणावाचे वातावरण आहे. बांग्लादेशात हजारो लोक रस्त्यावर उतरले असून, तेथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. भारत सरकार या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 

शेख हसीना यांना सत्तेवरुन हटवणे...परराष्ट्र मंत्री पुढे सांगतात, शेख हसीना यांना सत्तेवरून हटवणे हाच आंदोलकांचा एकमेव अजेंडा होता. भारत सरकार लष्करप्रमुखांच्या संपर्कात आहे. आम्हाला आशा आहे की, आता बांग्लादेशातील प्रभारी सरकार भारतीय उच्चायुक्तालय आणि आमच्या लोकांना सुरक्षा प्रदान करेल. शेख हसीना यांनी काही काळ भारतात राहण्याची विनंती केली होती, त्यामुळे त्या सध्या भारतात राहतील, असेही जयशंकर यांनी सांगितले. 

4 ऑगस्टला परिस्थिती सर्वात जास्त बिघडलीबांग्लादेशात जानेवारीपासून तणाव आहे. आम्ही तेथील राजकीय पक्षांच्या संपर्कात होतो. हिंसाचारात बांग्लादेशातील सरकारी इमारती आणि पायाभूत सुविधांवर हल्ले झाले आहेत. जुलै महिन्यात महिनाभर हिंसाचार सुरू होता. अनेक ठिकाणी अल्पसंख्याकांच्या दुकानांवर आणि मंदिरांवर हल्ले होत आहेत, ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे, असेही जयशंकर यावेळी म्हणाले.

परराष्ट्र मंत्री सर्वपक्षीय बैठकीत काय म्हणाले?जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीत हिंसाचारग्रस्त देशातील परिस्थिती आणि या परिस्थितीच्या संभाव्य सुरक्षा, आर्थिक आणि राजनैतिक परिणामांना तोंड देण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. ते म्हणाले, बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत सरकारकडून मदत मागिली होती, त्यानुसार त्यांची मदत केली जाईल. शेख हसीना मोठ्या धक्क्यात आहेत, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यापूर्वी सरकार त्यांना वेळ देत आहे. भारताने बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांशी चर्चा केली असून, त्यांना 10,000 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरBangladeshबांगलादेशParliamentसंसदBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार