शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यास देणार कवचकुंडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:11 IST

दलित आणि आदिवासींचे आपणच खरे कैवारी आहोत आणि त्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पक्का संदेश ठाम कृतीतून देण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केली आहे.

नवी दिल्ली : दलित आणि आदिवासींचे आपणच खरे कैवारी आहोत आणि त्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पक्का संदेश ठाम कृतीतून देण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या फिर्यादीची शहानिशा केल्याखेरीज गुन्हा नोंदविण्यास व अटक करण्यास मज्जाव करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करणारा वटहुकूम काढण्याखेरीज हा कायदा कोर्टाच्या कक्षेबाहेर ठेवण्यासाठी त्याला घटनात्मक कवचकुंडले चढविण्याचाही सरकारचा विचार आहे.मार्चमधील निकालाच्या फेरविचारासाठी सरकारने याचिका केली आहे. त्याचा निर्णय होईपर्यंत निकालास स्थगिती द्यावी, ही दोन वेळा केलेली विनंती न्यायालयाने अमान्य केली. आता १६ मेच्या सुनावणीत काय होते यावर सरकारची पुढील पावले अवलंबून असतील.सूत्रांनी सांगितले की, न्यायालयाने फेरविचारास नकार दिला तर वटहुकूम काढून अ‍ॅट्रॉसिटी कायदा पूर्वी होता तसा केला जाईल. हे पहिले पाऊल असेल. त्यानंतर हा कायदा राज्यघटनेच्या नवव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी सरकार करीत आहे. तसे केले की या कायद्यास न्यायालयात आव्हान देता येणार नाही.काय आहे ९वे परिशिष्ट?या परिशिष्टात नव्या कायद्याचा समावेश करण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घ्यावे लागेल. सरकारचे बहुमत तर आहेच. शिवाय विरोधकही उघडपणे दलितविरोधी भूमिका घेणार नाहीत, या खात्रीने हे विधेयक मंजूर होण्याची सरकारला खात्री वाटते.ठरावीक कायदे न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवून न्यायालयांनी अवैध ठरविले तरी त्यांची वैधता अबाधित ठेवण्याचा अधिकार राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१-बी अन्वये सरकारला आहे.स्वातंत्र्यानंतर लगेच सरकारने भूमीसुधारणा कायदे केले. न्यायालयांनी ते अवैध ठरवून रद्द करण्यास सुरुवात केली. तेव्हा सन १९५१ मध्ये म्हणजे राज्यघटना लागू झाल्यानंतर पहिल्याच वर्षी घटनादुरुस्ती करून अनुच्छेद ३१ बी अंतर्भूत केले गेले.१९७३ पर्यंत या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या कायद्यांना पूर्ण संरक्षण होते. मात्र, त्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती प्रकरणात संसद राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलू शकत नाही, असा निकाल दिला.