शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

एटीएमवरही होऊ शकतो सायबर हल्ला

By admin | Updated: May 15, 2017 00:29 IST

आंध्र प्रदेश पोलिसांच्या १०२ सिस्टीमला हॅकर्सने हॅक केल्यानंतर देशातील सायबर हल्ल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आंध्र प्रदेश पोलिसांच्या १०२ सिस्टीमला हॅकर्सने हॅक केल्यानंतर देशातील सायबर हल्ल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देशातील ७० टक्के एटीएम सायबर हल्ल्याची शिकार होऊ शकतात. कारण, या एटीएममध्ये आउटडेटेड झालेल्या विंडोज एक्सपीचा उपयोग करण्यात येतो. या सिस्टीमचे नियंत्रण त्या विक्रेत्यांकडे असते जे बँकेला ही सिस्टीम पुरवितात. मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपीला सपोर्ट करणे बंद केलेले आहे. आंध्रातील सायबर अ‍ॅटॅकनंतर मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपीसाठी अपडेट रीलीज केले आहेत. जर भारतातील एटीएमला सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य केले तर परिस्थिती किती बिकट होऊ शकते याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सायबर सुरक्षा सल्लागार गुलशन राय यांनी सांगितले की, अशा १०० सिस्टीमवर हल्ला झाला होता. पण, आता कोणताही धोका नाही. सायबर हल्लेखोर या डेटाला इनस्क्रिप्ट करून लॉक करतात. डेटाला डिक्रिप्ट करण्यासाठी ते रक्कम मागतात. चेन्नईच्या बाहेरच्या भागातील निस्सान - रेनॉल्ट या कंपनीचे उत्पादन सायबर हल्ल्यामुळे बंद करण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे. पण, कंपनीने यावर काही भाष्य केले नाही. सरकारी आकडेवारीनुसार, गत १२ ते १४ महिन्यांत भारतात ११ हजार नेटवर्कविरुद्ध हल्ले झाले आहेत. भारत त्या ९९ देशांपैकी एक आहे ज्या देशात अधिकाधिक सायबर हल्ले होतात.