शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 19:01 IST

Delhi CM Atishi : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत.

Delhi CM Atishi : नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शनिवारी राजभवनात आयोजित कार्यक्रमात अतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आतिशी यांच्यासह ५ मंत्र्यांनीही शपथ घेतली. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामा दिल्यानंतर  विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. 

आतिशी या आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याकडे दिल्लीची मोठी जबाबदारी दिली आहे. पण, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. आतिशी यांचा सरकार चालवण्याचा पुढील मार्ग सोपा नसणार आहे. कारण, आम आदमी पक्षावर आधीच अनेक गंभीर आरोप झाले आहेत. अशा परिस्थितीत आतिशी या दिल्लीचे सरकार कसे चालवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विरोधकांचा हल्लाबोल होणार अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत राजीनाम्याची घोषणा केल्यापासून भाजपसह संपूर्ण विरोधक सातत्याने आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत आहेत. आम आदमी पक्षाच्या सरकारवर गलथान कारभाराचा आरोप भाजप करत आहे. अशा स्थितीत आतिशी यांनी सरकारच्या कामाला गती देण्याची गरज आहे. त्यांना कमी वेळेत जास्त काम करावे लागेल. तसेच, भाजपसोबतच काँग्रेस सुद्धा आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत आहे. दरम्यान, जशा निवडणुका जवळ येतील, तसं विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत आतिशी यांना आपल्या कामाच्या जोरावर विरोधकांना उत्तर द्यावं लागणार आहे.

पक्षाची प्रतिमा सुधारणं, मोठं आव्हान असणारदिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण प्रकरणात जामिनावर आहेत. याशिवाय, अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर पक्षाचे नेते मनीष सिसोदियाही बाहेर आले आहेत. अशा स्थितीत आम आदमी पक्षाची प्रतिमा सुधारणे, हे मुख्यमंत्री अतिशी यांच्यासाठी मोठं काम असणार आहे. सरकारी योजना प्रभावीपणे राबवण्यासोबतच आतिशी यांना जनतेत जाऊन पक्षाची बाजू मांडावी लागणार आहे.

आश्वासनांची पूर्तता करावी लागणारयाचबरोबर, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला अनेक महत्त्वाची आश्वासने दिली आहेत. २०२५ पर्यंत यमुना स्वच्छ करणे, मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना १,००० रुपये मानधन देणे, सेवा घरापर्यंत पोहोचवण्याची योजना, दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण २.० आणि सौर धोरण लागू करणे, अशी अनेक आश्वासने अरविंद केजरीवाल यांनी दिली आहेत. त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी आतिशी यांना या योजना आणि आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे.

टॅग्स :AtishiआतिशीAAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी