शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

"अरविंद केजरीवालांना अटक ही भाजपाची मोठी चूक; जनता हुकूमशाही संपवेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 10:30 IST

Arvind Kejriwal And BJP : आतिशी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे दिल्लीतील लोक अत्यंत संतप्त आहेत. लोकसभा निवडणुकीत ते भाजपाला चोख प्रत्युत्तर देतील असं म्हटलं आहे.

दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे दिल्लीतील लोक अत्यंत संतप्त आहेत. लोकसभा निवडणुकीत ते भाजपाला चोख प्रत्युत्तर देतील असं म्हटलं आहे. कालकाजी भागात 'जेल का जवाब, वोट से' मोहिमेअंतर्गत एका कार्यक्रमात आतिशी म्हणाल्या की, "मुख्यमंत्री केजरीवाल यांना 'खोट्या' प्रकरणात अटक करण्यात आल्याचं राजधानीतील लोकांना समजलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अटकेबद्दल असंतोष व्यक्त करणाऱ्या लोकांकडून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. "केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला आपलं कुटुंब मानलं आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला त्यांच्या "कारस्थाना" चे परिणाम भोगावे लागतील. दिल्लीतील लोक केजरीवालांवर प्रेम करतात कारण त्यांना माहीत आहे की, त्यांनी सरकारी शाळांचे जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये 'परिवर्तन' केले आहे आणि सामान्य लोकांच्या मुलांना 'उत्कृष्ट' शिक्षण दिले आहे."

"केजरीवाल दिल्लीला मानतात कुटुंब"

"अरविंद केजरीवाल हे असे आहेत ज्यांनी दोन कोटी दिल्लीकरांना आपलं कुटुंब मानले आणि त्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली आणि उत्कृष्ट रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकची व्यवस्था केली. त्यांनीच दिल्लीतील जनतेला चांगल्या सुविधा दिल्या आहेत."

"देशातील जनता 'हुकूमशाही' संपवेल"

"दिल्लीच्या 'लोकप्रिय' मुख्यमंत्र्यांची भाजपा आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली अटक ही 'मोठी चूक' आहे. त्यामुळे देशातील जनता 'हुकूमशाही' संपवेल" असंही आतिशी यांनी म्हटलं आहे. या मोहिमेदरम्यान आतिशी यांनी लोकांची भेट घेतली आणि आम आदमी पार्टीसाठी समर्थन मागितलं आहे. ED ने 21 मार्च 2024 रोजी सीएम अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआपPoliticsराजकारणdelhiदिल्ली