शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

Assembly Election: सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनमत, तरीही मतदारांसमोर नाही स्पष्ट पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 06:29 IST

गोवा, पंजाब आणि उत्तराखंड या तुलनेने लहान राज्यांत आश्चर्यकारक निकालाची चर्चा अराजकीय वर्तुळात सुरूही झाली आहे. 

- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्येही बहुरंगी लढती आणि सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत असले तरी मतदारांना स्पष्ट पर्याय उपलब्ध नाही. गोवा, पंजाब आणि उत्तराखंड या तुलनेने लहान राज्यांत आश्चर्यकारक निकालाची चर्चा अराजकीय वर्तुळात सुरूही झाली आहे. राजकीय खेळाडू हे या राज्यांत पक्ष सोडून जाणाऱ्यांना प्रोत्साहन देत असल्यामुळे त्यातून त्यांचे पक्ष ही निवडणूक कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांवर विसंबून जिंकू शकत नाही हेच मान्य करीत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस ३० टक्के अनुसूचित जातींची मते व दलित मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर विसंबून राहणार असेल, तर हिंदू आणि शीख मतदार दुखावले जाणार आहेत. आम आदमी पक्षाकडे (आप) निष्ठावंत कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे किसान फ्रंट ‘आप’च्या मतांत फूट पाडू शकेल. काँग्रेस पक्षाच्या आमदारांची निवड ही पक्षनिष्ठा आणि गट समित्यांनी केलेल्या शिफारशींवरून केलेली असल्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत अशा आत्मविश्वास ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या आमदारांना फोडल्यानंतर तृणमूल काँग्रेस आता निवडणुकीच्या आधी युतीसाठी आग्रही आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडून स्पष्ट प्रस्ताव आलेला नाही, असे चिदंबरम म्हणाले. गोवा काँग्रेस अशा युतीविरोधात आहे. कारण पंजाब आणि उत्तराखंडमध्ये ‘आप’ काँग्रेसविरोधात लढत आहे. तिसऱ्यांदा भाजप?भाजपविरोधातील पक्षांत होणारी मतविभागणी भाजपला तिसऱ्यांदा सत्ता देऊ शकेल का? भाजपदेखील बळकट नाही हे विशेष. उत्तराखंड अस्तित्वात आल्यापासून दिवंगत एन. डी. तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला ५ वर्षे पूर्ण करता आलेले नाहीत. भाजप उत्तर प्रदेशातील निवडणूक ही रामराज्य विरुद्ध गुंडा राज असल्याचे सांगत आहे.मित्रपक्ष बनले भाजपला तापपाटणा : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राजकीय स्थान मिळवण्यासाठी भाजपच्या सहयोगी पक्षांतील अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. जनता दल (संयुक्त), विकासशील इन्सान पार्टीने (व्हीआयपी)  उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय जनता दलानेही (राजद) उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पराभूत करण्याचा विडा उचलला आहे.राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) घटक पक्ष उत्तर प्रदेशमध्ये एक-दुसऱ्यापासून वेगवेगळ्या मार्गांवर दिसत आहेत. बिहारमध्ये रालोआच्या भाजप व जदयू या दोन महत्त्वाच्या घटक पक्षांतील बोलणी अजून संपलेली नाही, तरीही दोघांमधील दबावाचे राजकारण कमी झालेले दिसत नाही. मुकेश सहनी यांचा व्हीआयपी तर उघडपणे भाजपविरोधात आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चादेखील (हम) स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये जनता दलाने (संयुक्त) ५१ जागा लढवण्याचे ठरवले आहे. जदयूने ही इच्छा भाजपला आधीच सांगितली होती; परंतु अजून दोन्ही पक्षांत काही सूत्र ठरलेले नाही.जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह म्हणाले की, जर भाजपने समझोत्याचा निर्णय लवकर नाही घेतला, तर जदयूचे उत्तर प्रदेश अध्यक्ष उमेदवारांची यादी जाहीर करतील. तसे झाले तर याचा परिणाम बिहारमध्ये होऊ शकतो व बिहारमधील राजकारण वेगळे वळण घेईल.उत्तर प्रदेश- अधिकाऱ्यावर आरोपगोंडाचे जिल्हादंडाधिकारी मार्कंडेय साहनी हे भाजपच्या हिताचे काम करीत असल्याचा आरोप निवडणूक आयोगाकडे समाजवादी पक्षाने गुरुवारी केला.