शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

आसामचा नवा कर्णधार

By admin | Updated: May 20, 2016 09:16 IST

ईशान्येत भाजपाच्या पहिल्या सरकारचे कर्णधार होणारे सर्वानंद सोनोवाल यांनी गेल्या 15 वर्षापासून राज्यात सत्तारूढ गोगोईंच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारला पदच्युत केले.

पंधरा वर्षानी झाले सत्तांतर 
 
गुवाहाटी : ईशान्येत भाजपाच्या पहिल्या सरकारचे कर्णधार होणारे सर्वानंद सोनोवाल यांनी गेल्या 15 वर्षापासून राज्यात सत्तारूढ गोगोईंच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारला पदच्युत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास कायम राखला आहे. मोदींनीच केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार मंत्री तसेच आसामच्या लखिमपूरचे खासदार सोनोवाल यांच्या तरुण खांद्यांवर भाजपासाठी ईशान्येचे द्वार खुले करण्याची जबाबदारी सोपविली होती. 
 31 ऑक्टोबर 1962 रोजी आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात जन्मलेले 54 वर्षीय सोनोवाल यांनी महाविद्यालयीन राजकारण ते केंद्रीय मंत्रिपद असा प्रवास केला आहे. 1992 ते 1999 या कालावधीत ते ऑल आसाम स्टुडंट्स युनियनचे (आसू) अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणात या विद्यार्थी संघटनेचा बराच प्रभाव असून आसूने सहा वर्षे आसाम आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी 8 फेब्रुवारी 2011 रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रथम पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणि नंतर राज्यात भाजपाचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 
पुढे 2012 मध्ये सोनोवाल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आणि आजही ते या पदावर कायम आहेत. या वर्षी 28 जानेवारीला पक्षाने त्यांना आसाममध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले होते. सोनोवाल सर्वप्रथम 2क्क्1 साली मोरन विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. परंतु 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते दिब्रुगडमधून निवडून गेले होते.
 
गोगोईंची जादू चाललीच नाही
 
सत्ताविरोधी लाट व वाढत्या वयोमानामुळे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई या वेळी विधानसभा निवडणुकीत व्यक्तिमत्त्वाची जादू पसरविण्यात अपयशी ठरले. गेल्या निवडणुकीर्पयत हॅट्ट्रिक मारणारे काँग्रेसचे हे दिग्गज नेते या वेळी विजयाचा चौकार मारू शकले नाहीत. अंतर्गत शत्रूंमुळे 8क् वर्षीय गोगोई यांनी निवडणुकीत पक्षाची नौका एकटय़ाने वल्हवण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसच्या दिशेने येणारे वादळ परतवण्यात ते अपयशी ठरले. दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेल्या आसामला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणण्याचे श्रेय गोगोई यांना जाते.
 
परंतु मुख्यमंत्रिपदाच्या तिस:या कार्यकाळात त्यांना प्रचंड विरोध होऊ लागला होता आणि विरोधाच्या या आगीत तेल ओतण्याचे काम एकेकाळी गोगोईंचे अत्यंत लाडके नेता हिमंता बिस्वा शर्मा यांनी केले. मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघणारे शर्मा यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आमदारांच्या एका गटाला सोबत घेत बंडखोरीचा ङोंडा हाती घेतला होता. परंतु काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे गोगोई आपली सत्ता वाचविण्यात यशस्वी ठरले होते. दुस-या कार्यकाळात काही उतारचढाव बघितल्यानंतर तिस:या कार्यकाळात गोगोईंना प्रकृतीने साथ दिली नाही. 
 (वृत्तसंस्था)