शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

आसाममध्ये महिलेला खांबाला बांधून मारहाण, मुले पळविणारी असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:55 IST

मुले पळविणारी महिला असल्याच्या संशयावरून एका महिलेला ग्रामस्थांनी खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यात घडली. अर्थात, अन्य काही ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर ही मारहाण थांबली आणि पोलिसांना बोलविण्यात आले.

गुवाहाटी : मुले पळविणारी महिला असल्याच्या संशयावरून एका महिलेला ग्रामस्थांनी खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यात घडली. अर्थात, अन्य काही ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर ही मारहाण थांबली आणि पोलिसांना बोलविण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून आसाम व त्रिपुरात गुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवा पसरत असून, त्यामुळे केवळ संशयावरून अनेकांना मारहाण होत आहे. काही दिवसांपूर्वी यावरून झालेल्या मारहाणीत एक व्यक्ती मरण पावली. त्रिपुरामध्ये आठवडाभरात लोकांनी संशयावरून चार जणांना ठेचून मारले, तर तीन जणांना प्रचंड मारहाण केली. ते तिघे उपचार घेत आहेत. त्रिपुरामध्ये तर अफवांवर विश्वास ठेवू नका, असा प्रचार करणाºया सरकारी कर्मचाºयालाच बेदम चोप दिला. तो गुरुवारी मरण पावला. आसाममधील सोनीतपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुमल महाट्टा म्हणाले की, शुक्रवारी रात्री आम्हाला फोन आला की, कटानी ग्रामस्थांनी एका संशयित महिलेला पकडले आहे. तिथे जाताच पोलिसांना समजले की ती बोलू शकत नव्हती. कदाचित त्यामुळेच ग्रामस्थांना तिच्याबाबत संशय आला असावा. (वृत्तसंस्था)गुन्हा दाखल नाहीही महिला बाहेरगावची आहे. अफवा पसरल्या आणि लोक घाबरले. त्यातूनच हा हल्ला झाला. ही महिला बिहारची अथवा स्थानिक आदिवासी असावी, असा अंदाज आहे. दरम्यान, महिलेला उपचारासाठी तेजपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

टॅग्स :Womenमहिला