शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

कोरोना लस न घेणाऱ्यांवर आसाममध्ये कडक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी 'नो एन्ट्री'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 11:12 IST

CoronaVirus Vaccine : आसाममध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारताच्या ईशान्य भागात असलेल्या एका राज्याने कोरोना लसीबाबत (Corona Vaccine) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आसाममध्ये (Assam) लस न घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. त्याचबरोबर, अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणी तत्काळ प्रवेश दिला जाणार नाही.

आसाममध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यात ही कोरोना महामारी रोखण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Hemant Biswa Sarma) म्हणाले की, ज्यांनी कोरोना लसीचे (Corona Vaccine)दोन्ही डोस घेतलेले नाहीत, त्यांना उद्यापासून जिल्हा न्यायालय, हॉटेल, बाजारपेठ आदी सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. यासोबतच राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, अद्याप अशी परिस्थिती नाही, मात्र मास्क घालणे अनिवार्य आहे.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 2,58,089 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. कालच्यापेक्षा हा आकडा 13,113 रुग्णांनी कमी आहे. तर 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 1,51,740 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या 16,56,341 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसाचा पॉझिटिव्हीटी रेट 119.65 टक्क्यांवर गेला आहे. तर ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 8,209 वर गेला आहे. 

आतापर्यंत भारतात कोरोना लसीचे 157.20 कोटी डोस देण्यात आले आहेत. चाचणीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) नुसार, भारतात काल म्हणजेच रविवारपर्यंत 13,13,444 चाचण्या करण्यात आल्या, कालपर्यंत एकूण 70,37,62,282 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या