शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

आसाम पोलिसांना मोठं यश, 644 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:34 IST

'आसामसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे'

गुवाहाटी : आसाममध्ये नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. राज्यात बंदी घालण्यात आलेल्या आठ संघटनांच्या 644 नक्षलवाद्यांनी गुरूवारी 177 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे. 

उल्फा (आय), एनडीएफबी, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआय (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबी या संघटनेच्या सदस्यांनी एका कार्यक्रमात आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

इतक्या मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करणे म्हणजे राज्य पोलिसांचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. पोलीस महासंचालक ज्योती महंता यांनी पत्रकारांना सांगितले की, "राज्यासाठी आणि आसाम पोलिसांसाठी एक महत्वपूर्ण दिवस आहे. आठ नक्षलवादी संघटनांच्या एकूण 644 कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आत्मसमर्पण केले आहे." 

याचबरोबर, या नक्षलवाद्यांकडून जी शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत. यात एके-47, एके-56 यांसारख्या अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. आसामसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचा पोलीस दलात समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असे पोलीस महासंचालक ज्योती महंता यांनी सांगितले. विशेष म्हणजे, आसामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस