शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘वंदे भारत’वर दगडफेकीच्या घटना; आातपर्यंत किती लाखांचे नुकसान झाले? रेल्वेमंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 21:06 IST

Vande Bharat Express Train: वंदे भारत एक्स्प्रेसवर होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली.

Vande Bharat Express Train: भारतीय रेल्वेची वंदे भारत एक्स्प्रेस आताच्या घडीला सर्वांत लोकप्रिय ट्रेन सेवांपैकी आहे. प्रवाशांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही समाजकंटकांमुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सातत्याने नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून देशभरात विविध ठिकाणी या ट्रेनवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये किती नुकसान झाले, किती जणांना अटक करण्यात आली, याबाबतची सविस्तर माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. भारतीय रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेस देशातील विविध ठिकाणी सुरू करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. सन २०१९ मध्ये देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली. वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, सन २०१९ पासून आतापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसवर झालेल्या दगडफेकीमुळे रेल्वेचे ५५ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.

किती जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे?

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, दगडफेकीच्या घटनांप्रकरणी आतापर्यंत १५१ जणांना अटक करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये कोणत्याही प्रवाशाची जीवितहानी किंवा कोणत्याही प्रवाशाच्या सामानाची चोरी किंवा नुकसान झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही, अशी माहिती वैष्णव यांनी दिली. वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याच्या घटना २०१९, २०२०, २०२१, २०२२ आणि जून २०२३ पर्यंत घडल्या आहेत. या दगडफेकीच्या घटनांमुळे रेल्वेला ५५.६० लाख रुपयांचा नुकसान सहन करावे लागले आहे, असे ते म्हणाले

दरम्यान, रेल्वे प्रवाशांचे संरक्षण आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी RPF, GRP/जिल्हा पोलिस आणि नागरी प्रशासन यांच्याशी जवळून समन्वय साधून काम करत आहे. दगडफेकीच्या घटनांविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘ऑपरेशन साथी’ राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. दगडफेकीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या घटनांचे विश्लेषण केल्यानंतर त्यांना आळा घालण्यासाठी ठोस कारवाई केली जाते. बाधित विभाग किंवा ‘ब्लॅक स्पॉट्स’मध्ये गैरप्रकार करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात नियमित मोहीम राबवली जात असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वे