शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

‘वंदे भारत’वर दगडफेकीच्या घटना; आातपर्यंत किती लाखांचे नुकसान झाले? रेल्वेमंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 21:06 IST

Vande Bharat Express Train: वंदे भारत एक्स्प्रेसवर होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली.

Vande Bharat Express Train: भारतीय रेल्वेची वंदे भारत एक्स्प्रेस आताच्या घडीला सर्वांत लोकप्रिय ट्रेन सेवांपैकी आहे. प्रवाशांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही समाजकंटकांमुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सातत्याने नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून देशभरात विविध ठिकाणी या ट्रेनवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये किती नुकसान झाले, किती जणांना अटक करण्यात आली, याबाबतची सविस्तर माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. भारतीय रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेस देशातील विविध ठिकाणी सुरू करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. सन २०१९ मध्ये देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली. वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, सन २०१९ पासून आतापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसवर झालेल्या दगडफेकीमुळे रेल्वेचे ५५ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.

किती जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे?

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, दगडफेकीच्या घटनांप्रकरणी आतापर्यंत १५१ जणांना अटक करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये कोणत्याही प्रवाशाची जीवितहानी किंवा कोणत्याही प्रवाशाच्या सामानाची चोरी किंवा नुकसान झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही, अशी माहिती वैष्णव यांनी दिली. वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याच्या घटना २०१९, २०२०, २०२१, २०२२ आणि जून २०२३ पर्यंत घडल्या आहेत. या दगडफेकीच्या घटनांमुळे रेल्वेला ५५.६० लाख रुपयांचा नुकसान सहन करावे लागले आहे, असे ते म्हणाले

दरम्यान, रेल्वे प्रवाशांचे संरक्षण आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी RPF, GRP/जिल्हा पोलिस आणि नागरी प्रशासन यांच्याशी जवळून समन्वय साधून काम करत आहे. दगडफेकीच्या घटनांविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘ऑपरेशन साथी’ राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. दगडफेकीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या घटनांचे विश्लेषण केल्यानंतर त्यांना आळा घालण्यासाठी ठोस कारवाई केली जाते. बाधित विभाग किंवा ‘ब्लॅक स्पॉट्स’मध्ये गैरप्रकार करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात नियमित मोहीम राबवली जात असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वे