शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या पराभवासाठी औवेसी सरसावले, ममता बॅनर्जींकडे दोस्तीचा हात   

By महेश गलांडे | Updated: November 19, 2020 13:37 IST

पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या औवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. निवडणुकांपूर्वी आघाडी करण्यास उत्सुक आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या औवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. निवडणुकांपूर्वी आघाडी करण्यास उत्सुक आहे.

कोलकाता - बिहारच्या विजयानंतर आता भारतीय जनता पक्षाने मिशन पश्चिम बंगालसाठी कंबर कसली आहे. यासाठी भाजपने पश्चिम बंगालचे पाच विभाग तयार केले असून प्रत्येकाची जबाबदारी एका नेत्याकडे निश्चित केली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसकडून सत्ता खेचण्याचं भाजपाचं स्वप्न आहे. तर, दुसरीकडे एआयएमआयएमचे नेते आणि खासदार असुदुद्दीन औवेसी यांनीही बिहारनंतर आपला मोर्चा बंगालच्यादिशेने वळवला आहे. 

पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या औवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. निवडणुकांपूर्वी आघाडी करण्यास उत्सुक आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी आमच्याकडून तृणमूल काँग्रेसल मदत करण्यात येईल, असे औवेसी यानी म्हटलं आहे. बिहारमधील सिमांचल भागात 5 जागांवर विजय मिळवल्यानंतर एमआयएमच्या पक्षाचा आणि नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळेच, पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये आपण उमेदवार उभे करणार असल्याचं औवेसी यांनी म्हटलंय. त्यासाठी, एमआयएमची नजर अल्पसंख्याक समुदाय असलेल्या मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तरी दिनाजपूर येथे आहे. 

एमआयएम म्हणजे 'बाहरी' 

ममता बॅनर्जी यांनी नुकतेच एमआयएम पक्षावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता, काही बाहरी लोकांना परेशान करणार असल्याचं ममता यांनी म्हटलं होतं. तसेच, राज्यातील जनतेला बाहरी म्हणजे परराज्यातून येणाऱ्या पक्षाला विरोध करण्याचंही सांगितलं होतं. 

एमआयएमच्या एंट्रीने तृणमूलला नुकसान

बंगालमधील निवडणुकांत एमआयएमचा प्रवेश हा ममता बॅनर्जींच्या टीएमसीसाठी धोक्याची घंटा असल्याचं टीएमसीला वाटतंय. कारण, यंदा भाजपा विरुद्ध टीएमसी असा थेट सामना रंगणार आहे. तर, काँग्रेस आणि डाव्या पक्षांची लढाईसुद्धा तृणमूलसोबतच आहे. त्यामुळे, औवेसींचा एमआयएम पक्ष थेट निवडणुकांच्या रिंगणात उतरल्यास त्याचे नुकसान तृणमूल काँग्रेसलाच होणार आहे.  

भाजपकडून 5 नेत्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप

भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदनापूर या विभागाची जबाबदारी असेल. विनोद तावडे हे नाबादीपमध्ये निवडणुकीची तयारी पाहतील. विनोद सोनकर यांच्याकडे बर्दमान तर हरीश द्विवेदी यांच्याकडे उत्तर बंगालची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे चारही नेते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. याशिवाय भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे. हे पाचही नेते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत निवडणुकीच्या तयारीचा अहवाल तयार करून पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सादर करतील. या अहवालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालचा दौरा करण्याची शक्यता आहे.वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय हेच पश्चिम बंगाल राज्याचे प्रभारी असतील. 

गतनिवडणुकीत भाजपाला केवळ 3 जागा

गेल्या निवडणुकीत टीएमसीला सर्वाधिक २११, काँग्रेसला ४०, डाव्या पक्षांना २६ तर भाजपला केव‌ळ ३ जागा मिळाल्या होत्या. सत्तास्थापनेसाठी राज्यात १४८ जागा आवश्यक असतात

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी