शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पंतप्रधान ज्यांना भाऊ म्हणतात, त्यांनीच देशाला लुटले - ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 13:42 IST

बाबरी मशिद प्रकरणावरुनही ओवेसी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टिका केली आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी ज्या लोकांना भाऊ म्हणतात, त्याच लोकांनी देशाला लुटले आहे, सध्या भारत देश हिंदुत्वाकडे जात आहे. आम्हाला मुस्लिम असल्याने दुसऱ्या वर्गातील नागरिक असल्यासारखी वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य  'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसींनी राजधानी दिल्लीमध्ये केले आहे. 

यावेळी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरून ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. गीतांजली जेम्सचे मालक मेहुल चोक्सी यांच्यासोबत काय संबंध आहेत? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की,  जे लोक आम्हाला पाकिस्तानी म्हणतात. त्यांना माझा सवाल आहे. हर्षद मेहता, केतन पारेख आणि नीरव मोदी हे मुस्लिम होते का?

बाबरी मशिद प्रकरणावरुनही ओवेसी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टिका केली आहे. अयोध्याच्या वादग्रस्त जागेवरील बाबरी मशिदीचा दावा आम्ही कधीच सोडणार नाही. आमची मशीद होती, आहे, आणि यापुढेही राहील, असं संवेदनशील वक्तव्य 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसींनी दिल्लीमध्ये केलं आहे. काल ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमात ओवेसी म्हणाले की, बाबरी मशीदप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय श्रद्धेच्या आधारावर नव्हे तर पुराव्याच्या आधारावर येईल. जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आला तर बाबरी मशीद पुन्हा एकदा त्याच ठिकाणी उभी राहील.  काही लोक या प्रकरणी आम्हाला भीती दाखवत आहेत. आमच्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. ते आम्हाला दावा सोडायला सांगत आहेत. परंतु, मी त्यांना सांगतोय की, अयोध्याच्या वादग्रस्त जागेवरचा मशिदीवरचा दावा मुस्लिम कधीच सोडणार नाहीत. असे ओवेसी यांनी भाजपाचे नाव न घेता सुनावले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी