शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Asaduddin Owaisi:"त्या 1500 मृत हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार"; 'काश्मीर फाइल्स'वरुन ओवेसींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 17:58 IST

Asaduddin Owaisi: 'कमिशन ऑफ इन्क्वायरी कायद्यांतर्गत स्वतंत्र चौकशी करा, सत्य समोर येईल.'

नवी दिल्ली : बॉलिवूड चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' रिलीज झाल्यापासून चर्चेत आणि वादात आहे. एकीकडे अनेकांना हा चित्रपट आवडलतोय, काही राज्यांनी तर चित्रपट करमुक्त केला आहे. पण, दुसरीकडे अनेकांनी या चित्रपटाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी(AIMIM Asaduddin Owaisi) यांनीही या चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'मुस्लिमांविरुद्ध द्वेष वाढतोय'एनडीटीव्हीशी बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ''चित्रपट पाहिल्यानंतर लोक मुस्लिमांविरोधात व्हिडिओ का बनवत आहेत? मुस्लिमांविरुद्ध द्वेष का वाढवला जातोय? सोशल मीडियावर असे कितीतरी व्हिडीओ आहेत, ज्यात कोणी सिनेमागृहात उभे राहून मुस्लिमांच्या विरोधात भाषण करत आहे, तर कोणी मुस्लिमांविरोधात काहीही बोलत आहे.'' 

'भाजपने इतक्या वर्षात काय केले'ते पुढे म्हणतात की, "काश्मीरमध्ये नक्कीच काश्मिरी पंडित मारले गेले. 209 लोक मारले गेले, माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे. पण डोग्रा भागातील जे 1500 हिंदू मारले गेले, त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार? चित्रपट पाहून देशाच्या पंतप्रधानांना काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली, पण या हिंदूंच्या दुःखाची नाही. भाजप सात वर्षांपासून सत्तेत आहे, आतापर्यंत त्यांच्यासाठी काय केल?" 

'त्या घटनेची चौकशी व्हायला हवी'ओवेसी पुढे म्हणाले की, ''मी लोकसभेत म्हणालो की, तुम्ही कमिशन ऑफ इन्क्वायरी कायद्यांतर्गत स्वतंत्र चौकशी आयोग करा, सत्य समोर येईल. त्या काळात किती काश्मिरी पंडित स्थलांतरित झाले आणि का झाले, हे चौकशीतून समोर येईल. तसेच, 16-17 जानेवारीपूर्वी नेमकं काय झालं, तेही समोर येईल. या सात वर्षांच्या सरकारने काश्मीरमध्ये किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन केले त्याची माहिती द्या," असेही ओवेसी म्हणाले.

'तेव्हा मुस्लिमांचा नरसंहार झाला'"तुम्ही काश्मिरींविरोधात द्वेष पसरवत आहात. आता नरसंहाराचा विषय निघालाच आहे, तर असाममध्ये 3-4 हजार मुस्लिमांनाही मारले गेले होते. मुरादाबादमध्ये काँग्रेसची सरकार असताना 500 पेक्षा जास्त मुस्लिमांना पोलिसांनी गोळ्या घातल्या होत्या, तो नरसंहार नव्हता का? त्यावरही चर्चा व्हायला हवी", असही ओवेसी म्हणाले.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स