शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
3
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
4
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
5
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
6
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?
7
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
8
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
10
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
11
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
12
येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...
13
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
14
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
15
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
16
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
17
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
18
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
19
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
20
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?

७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:24 IST

High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा १२ जणांनी १८ वर्षे भोगली. त्यांच्या आयुष्यातली चांगली वर्ष निघून गेली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल का, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. या प्रकरणी ७ जणांना जन्मठेप, तर ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोषींची निर्दोष मुक्तता झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे खळबळ उडाली असून, यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एक्सवर एक पोस्ट करत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निष्पाप लोकांना तुरुंगात पाठवले जाते. परंतु, अनेक वर्षांनंतर ते तुरुंगातून बाहेर येतात, तेव्हा त्यांचे जीवन पुन्हा सामान्यपणे सुरू होण्याची शक्यता धूसरच असते. गेल्या १७ वर्षांपासून हे आरोपी तुरुंगातच आहेत. ते एकही दिवस बाहेर पडलेले नाहीत. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे तुरुंगातच गेली. अशा प्रकरणांमध्ये जिथे सार्वजनिक आक्रोश असतो, तिथे पोलिसांचा दृष्टिकोन नेहमीच प्रथमतः आरोपी हे दोषी असल्याचे गृहीत धरण्याचाच असतो. अशा प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी पत्रकार परिषदा घेतात. त्यानंतर ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमे अशा प्रकरणाचे वृत्तांकन करतात, त्यावरून एखादी व्यक्ती ही निश्चितच दोषीच वाटू लागते. अशा अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी आम्हाला वाईटरित्या निराश केले आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. 

मोहम्मद माजिदच्या पत्नीचे आपल्या पतीशी शेवटचे संभाषण होऊ शकले नाही

दोषी ठरवण्यात आलेल्या १२ जणांपैकी अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले आहे. फैसल आणि मुजम्मिल या दोन सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही बातमी ऐकून त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. २०२३ ममध्ये त्याच्या आईचाही मृत्यू झाला. मोहम्मद माजिदच्या पत्नीचे आपल्या पतीशी शेवटचे संभाषण होऊ शकले नाही. २००६ मध्ये महाराष्ट्रात ज्या कोणत्या पक्षांची सत्ता होती, ते आरोपींनी केलेल्या छळाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यास जबाबदार आहेत, हे लक्षात ठेवावे. अर्थात सायंकाळी ६ आणि रात्री ९ वाजताच्या तथाकथित राष्ट्रवाद्यांनी या आरोपींबाबत निकाल दिला, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ज्या १२ मुस्लिम पुरूषांना १८ वर्षे अशा गुन्ह्यासाठी तुरुंगात डांबण्यात आले होते, जो त्यांनी केला नव्हता. त्यांच्या आयुष्यातली चांगली वर्ष निघून गेली. १८० कुटुंबे ज्यांनी त्यांचे प्रियजन गमावले, जे अनेक जण जखमी झाले, त्यांच्यासाठी काही केलेले नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल का, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. 

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटMumbai Localमुंबई लोकलMumbai High Courtमुंबई हायकोर्टAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी