शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
2
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
3
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
4
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
5
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
6
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
8
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
9
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
10
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
11
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
12
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
13
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
14
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
15
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
16
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
17
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
18
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
19
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
20
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती

७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:24 IST

High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा १२ जणांनी १८ वर्षे भोगली. त्यांच्या आयुष्यातली चांगली वर्ष निघून गेली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल का, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. या प्रकरणी ७ जणांना जन्मठेप, तर ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोषींची निर्दोष मुक्तता झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे खळबळ उडाली असून, यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एक्सवर एक पोस्ट करत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निष्पाप लोकांना तुरुंगात पाठवले जाते. परंतु, अनेक वर्षांनंतर ते तुरुंगातून बाहेर येतात, तेव्हा त्यांचे जीवन पुन्हा सामान्यपणे सुरू होण्याची शक्यता धूसरच असते. गेल्या १७ वर्षांपासून हे आरोपी तुरुंगातच आहेत. ते एकही दिवस बाहेर पडलेले नाहीत. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे तुरुंगातच गेली. अशा प्रकरणांमध्ये जिथे सार्वजनिक आक्रोश असतो, तिथे पोलिसांचा दृष्टिकोन नेहमीच प्रथमतः आरोपी हे दोषी असल्याचे गृहीत धरण्याचाच असतो. अशा प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी पत्रकार परिषदा घेतात. त्यानंतर ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमे अशा प्रकरणाचे वृत्तांकन करतात, त्यावरून एखादी व्यक्ती ही निश्चितच दोषीच वाटू लागते. अशा अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी आम्हाला वाईटरित्या निराश केले आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. 

मोहम्मद माजिदच्या पत्नीचे आपल्या पतीशी शेवटचे संभाषण होऊ शकले नाही

दोषी ठरवण्यात आलेल्या १२ जणांपैकी अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले आहे. फैसल आणि मुजम्मिल या दोन सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही बातमी ऐकून त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. २०२३ ममध्ये त्याच्या आईचाही मृत्यू झाला. मोहम्मद माजिदच्या पत्नीचे आपल्या पतीशी शेवटचे संभाषण होऊ शकले नाही. २००६ मध्ये महाराष्ट्रात ज्या कोणत्या पक्षांची सत्ता होती, ते आरोपींनी केलेल्या छळाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यास जबाबदार आहेत, हे लक्षात ठेवावे. अर्थात सायंकाळी ६ आणि रात्री ९ वाजताच्या तथाकथित राष्ट्रवाद्यांनी या आरोपींबाबत निकाल दिला, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ज्या १२ मुस्लिम पुरूषांना १८ वर्षे अशा गुन्ह्यासाठी तुरुंगात डांबण्यात आले होते, जो त्यांनी केला नव्हता. त्यांच्या आयुष्यातली चांगली वर्ष निघून गेली. १८० कुटुंबे ज्यांनी त्यांचे प्रियजन गमावले, जे अनेक जण जखमी झाले, त्यांच्यासाठी काही केलेले नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल का, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. 

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटMumbai Localमुंबई लोकलMumbai High Courtमुंबई हायकोर्टAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी