शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:24 IST

High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा १२ जणांनी १८ वर्षे भोगली. त्यांच्या आयुष्यातली चांगली वर्ष निघून गेली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल का, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. या प्रकरणी ७ जणांना जन्मठेप, तर ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोषींची निर्दोष मुक्तता झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे खळबळ उडाली असून, यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एक्सवर एक पोस्ट करत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निष्पाप लोकांना तुरुंगात पाठवले जाते. परंतु, अनेक वर्षांनंतर ते तुरुंगातून बाहेर येतात, तेव्हा त्यांचे जीवन पुन्हा सामान्यपणे सुरू होण्याची शक्यता धूसरच असते. गेल्या १७ वर्षांपासून हे आरोपी तुरुंगातच आहेत. ते एकही दिवस बाहेर पडलेले नाहीत. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे तुरुंगातच गेली. अशा प्रकरणांमध्ये जिथे सार्वजनिक आक्रोश असतो, तिथे पोलिसांचा दृष्टिकोन नेहमीच प्रथमतः आरोपी हे दोषी असल्याचे गृहीत धरण्याचाच असतो. अशा प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी पत्रकार परिषदा घेतात. त्यानंतर ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमे अशा प्रकरणाचे वृत्तांकन करतात, त्यावरून एखादी व्यक्ती ही निश्चितच दोषीच वाटू लागते. अशा अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी आम्हाला वाईटरित्या निराश केले आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. 

मोहम्मद माजिदच्या पत्नीचे आपल्या पतीशी शेवटचे संभाषण होऊ शकले नाही

दोषी ठरवण्यात आलेल्या १२ जणांपैकी अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले आहे. फैसल आणि मुजम्मिल या दोन सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही बातमी ऐकून त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. २०२३ ममध्ये त्याच्या आईचाही मृत्यू झाला. मोहम्मद माजिदच्या पत्नीचे आपल्या पतीशी शेवटचे संभाषण होऊ शकले नाही. २००६ मध्ये महाराष्ट्रात ज्या कोणत्या पक्षांची सत्ता होती, ते आरोपींनी केलेल्या छळाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यास जबाबदार आहेत, हे लक्षात ठेवावे. अर्थात सायंकाळी ६ आणि रात्री ९ वाजताच्या तथाकथित राष्ट्रवाद्यांनी या आरोपींबाबत निकाल दिला, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ज्या १२ मुस्लिम पुरूषांना १८ वर्षे अशा गुन्ह्यासाठी तुरुंगात डांबण्यात आले होते, जो त्यांनी केला नव्हता. त्यांच्या आयुष्यातली चांगली वर्ष निघून गेली. १८० कुटुंबे ज्यांनी त्यांचे प्रियजन गमावले, जे अनेक जण जखमी झाले, त्यांच्यासाठी काही केलेले नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल का, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. 

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटMumbai Localमुंबई लोकलMumbai High Courtमुंबई हायकोर्टAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी