शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Asaduddin Owaisi on RSS: “मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 05:37 IST

हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे.

नवी दिल्ली: संपूर्ण देशात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळाला. तर राजकीय पटलावरही दसरा सकाळपासून ते रात्रीपर्यंत चांगलाच गाजला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या विजयादशमी निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यानंतर बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला आणि रात्री शिवसेनेचे शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे दसरा मेळावे अगदी दणक्यात झाले. मोहन भागवत यांच्या विधानांचा समाचार घेत एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. मोहन भागवतांचे विजयादशमीचे भाषण द्वेषपूर्ण होते. तसेच देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही, असे सांगत ओवेसी यांनी अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला.

कर्तव्यपथ आत्मनिर्भर भारत होत आहे. मात्र आपला आत्मा काय आहे याबाबत नेतृत्व, नागरिक व समाजात स्पष्टता हवी. प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. लवचिकता ठेवावी लागते, असे सांगत मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य केले होते. यावरून ओवेसी यांनी टीका केली आहे. 

देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही

असदुद्दीन ओवेसी यांनी एकामागून एक ट्विट करत, जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो. सध्या लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही. आम्ही रिप्लेसमेंट दर आधीच गाठला आहे. चिंतेची बाब म्हणजे आपली लोकसंख्या वृद्धत्वाकडे वेगाने चाललेली आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. प्रजनन दरात सर्वांत वेगाने घट मुस्लिमांमध्ये दिसून आली आहे. मोहन भागवत दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने द्वेषपूर्ण भाषणे देतात. लोकांना वाढत्या लोकसंख्येची भीती दाखवतात. या भीतीमुळे नरसंहार, द्वेषाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे, असा आरोपही ओवेसी यांनी केला. 

दरम्यान, भारताने गांभीर्याने विचारमंथन करून सर्वसमावेशक असे लोकसंख्या धोरण आणण्याची गरज आहे. लोकसंख्येमध्येही पुराव्यांचा समतोल असायला हवा. लोकसंख्येच्या असंतुलनाचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हे पन्नास वर्षांपूर्वी घडले होते. पण आजही ते घडत आहे. पूर्व तिमोर नावाचा एक नवीन देश तयार झाला, दक्षिण सुदान नावाचा देश तयार झाला. कोसोवो झाला लोकसंख्येतील फरकामुळे नवे देश निर्माण झाले. देश फुटले. जन्मदर हा त्याचा देशाचा भाग आहे, पण बळजबरी, फसवणूक आणि लालसेमुळे होणारे धर्मांतर हा त्याचा मोठा घटक आहे. आणि जिथे सीमापार घुसखोरी होते तिथे घुसखोरीमुळे लोकसंख्येचा पॅटर्नही बदलतो. हा समतोल राखणे राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत