शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

Asaduddin Owaisi on RSS: “मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 05:37 IST

हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे.

नवी दिल्ली: संपूर्ण देशात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळाला. तर राजकीय पटलावरही दसरा सकाळपासून ते रात्रीपर्यंत चांगलाच गाजला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या विजयादशमी निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यानंतर बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला आणि रात्री शिवसेनेचे शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे दसरा मेळावे अगदी दणक्यात झाले. मोहन भागवत यांच्या विधानांचा समाचार घेत एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. मोहन भागवतांचे विजयादशमीचे भाषण द्वेषपूर्ण होते. तसेच देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही, असे सांगत ओवेसी यांनी अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला.

कर्तव्यपथ आत्मनिर्भर भारत होत आहे. मात्र आपला आत्मा काय आहे याबाबत नेतृत्व, नागरिक व समाजात स्पष्टता हवी. प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. लवचिकता ठेवावी लागते, असे सांगत मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य केले होते. यावरून ओवेसी यांनी टीका केली आहे. 

देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही

असदुद्दीन ओवेसी यांनी एकामागून एक ट्विट करत, जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो. सध्या लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही. आम्ही रिप्लेसमेंट दर आधीच गाठला आहे. चिंतेची बाब म्हणजे आपली लोकसंख्या वृद्धत्वाकडे वेगाने चाललेली आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. प्रजनन दरात सर्वांत वेगाने घट मुस्लिमांमध्ये दिसून आली आहे. मोहन भागवत दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने द्वेषपूर्ण भाषणे देतात. लोकांना वाढत्या लोकसंख्येची भीती दाखवतात. या भीतीमुळे नरसंहार, द्वेषाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे, असा आरोपही ओवेसी यांनी केला. 

दरम्यान, भारताने गांभीर्याने विचारमंथन करून सर्वसमावेशक असे लोकसंख्या धोरण आणण्याची गरज आहे. लोकसंख्येमध्येही पुराव्यांचा समतोल असायला हवा. लोकसंख्येच्या असंतुलनाचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हे पन्नास वर्षांपूर्वी घडले होते. पण आजही ते घडत आहे. पूर्व तिमोर नावाचा एक नवीन देश तयार झाला, दक्षिण सुदान नावाचा देश तयार झाला. कोसोवो झाला लोकसंख्येतील फरकामुळे नवे देश निर्माण झाले. देश फुटले. जन्मदर हा त्याचा देशाचा भाग आहे, पण बळजबरी, फसवणूक आणि लालसेमुळे होणारे धर्मांतर हा त्याचा मोठा घटक आहे. आणि जिथे सीमापार घुसखोरी होते तिथे घुसखोरीमुळे लोकसंख्येचा पॅटर्नही बदलतो. हा समतोल राखणे राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत