शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Asaduddin Owaisi on RSS: “मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 05:37 IST

हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे.

नवी दिल्ली: संपूर्ण देशात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळाला. तर राजकीय पटलावरही दसरा सकाळपासून ते रात्रीपर्यंत चांगलाच गाजला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या विजयादशमी निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यानंतर बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला आणि रात्री शिवसेनेचे शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे दसरा मेळावे अगदी दणक्यात झाले. मोहन भागवत यांच्या विधानांचा समाचार घेत एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. मोहन भागवतांचे विजयादशमीचे भाषण द्वेषपूर्ण होते. तसेच देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही, असे सांगत ओवेसी यांनी अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला.

कर्तव्यपथ आत्मनिर्भर भारत होत आहे. मात्र आपला आत्मा काय आहे याबाबत नेतृत्व, नागरिक व समाजात स्पष्टता हवी. प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. लवचिकता ठेवावी लागते, असे सांगत मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य केले होते. यावरून ओवेसी यांनी टीका केली आहे. 

देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही

असदुद्दीन ओवेसी यांनी एकामागून एक ट्विट करत, जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो. सध्या लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही. आम्ही रिप्लेसमेंट दर आधीच गाठला आहे. चिंतेची बाब म्हणजे आपली लोकसंख्या वृद्धत्वाकडे वेगाने चाललेली आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. प्रजनन दरात सर्वांत वेगाने घट मुस्लिमांमध्ये दिसून आली आहे. मोहन भागवत दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने द्वेषपूर्ण भाषणे देतात. लोकांना वाढत्या लोकसंख्येची भीती दाखवतात. या भीतीमुळे नरसंहार, द्वेषाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे, असा आरोपही ओवेसी यांनी केला. 

दरम्यान, भारताने गांभीर्याने विचारमंथन करून सर्वसमावेशक असे लोकसंख्या धोरण आणण्याची गरज आहे. लोकसंख्येमध्येही पुराव्यांचा समतोल असायला हवा. लोकसंख्येच्या असंतुलनाचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हे पन्नास वर्षांपूर्वी घडले होते. पण आजही ते घडत आहे. पूर्व तिमोर नावाचा एक नवीन देश तयार झाला, दक्षिण सुदान नावाचा देश तयार झाला. कोसोवो झाला लोकसंख्येतील फरकामुळे नवे देश निर्माण झाले. देश फुटले. जन्मदर हा त्याचा देशाचा भाग आहे, पण बळजबरी, फसवणूक आणि लालसेमुळे होणारे धर्मांतर हा त्याचा मोठा घटक आहे. आणि जिथे सीमापार घुसखोरी होते तिथे घुसखोरीमुळे लोकसंख्येचा पॅटर्नही बदलतो. हा समतोल राखणे राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत