शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जिरे फोडणी देऊ का? पालेभाज्या महाग; चणाडाळ, जिरे अन् हळदीचे भाव वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 11:01 IST

आगामी काही दिवसांत लाल मिरचीही महाग होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : पावसाळा सुरू होताच पहिल्यांदा पालेभाज्या महाग झाल्या. त्यानंतर आता चणाडाळ, जिरे आणि हळद यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे किचनचे बजेट बिघडले आहे. मोठी विलायची आणि दालचिनी यांचे भावही वाढले असून, आगामी काही दिवसांत लाल मिरचीही महाग होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

व्यावसायिकांनी सांगितले की, भाज्या महाग झाल्या की, लोक वरण, छोले, राजमा यांना प्राधान्य देतात; पण सर्वाधिक स्वस्त असलेली चणाडाळही आता १२० रुपये किलो झाल्यामुळे गृहिणी हैराण झाल्या आहेत. गेल्याच महिन्यात चणाडाळ १०० रुपये किलो होती. व्यावसायिकांनी सांगितले की, जुलै-ऑगस्टमध्ये चणे महागतात. चण्याचे पीक मार्च-एप्रिलमध्ये काढणीला येते. नवे पीक येताच चण्याचा भाव उतरतो. मध्य प्रदेश आणि हरयाणासह अनेक राज्यांत चण्याचे उत्पादन होते.

तुरीची डाळ २०० रुपयांवर

तूर डाळीचे भाव तेजीत आहेत. तूरडाळ २०० रुपये किलो दराने विकली जात आहे. उच्च दर्जाची तूरडाळ तर २२५ रुपयांपर्यंत आहे. मात्र, चणाडाळीचे भाव सध्या ११५ ते १२० रुपये किलो झाले आहेत.

हळद दुपटीपेक्षा अधिक वाढला

मसाला व्यावसायिक रवींद्र अग्रवाल म्हणाले की, यंदा मसाल्याचे भावही वाढले आहेत. यास प्रामुख्याने उत्पादनात झालेली घट हे कारण आहे. घाऊक बाजारात हळद दुपटीपेक्षा अधिक महाग होऊन १७० रुपये किलो झाली आहे.

जिरे २० रुपयांनी महागले

मागील काही दिवसांत जिरेही महागले आहेत. जियांचा भाव २० रुपयांपर्यंत वाढून ३२० रुपये किलो झाला आहे. मोठी विलायची व दालचिनीचे भावही वाढले आहेत. सूत्रांनी सांगितले की, येणाऱ्या दिवसांत लाल मिरच्यांचे भावही वाढतील, असा अंदाज आहे.

टॅग्स :Inflationमहागाईvegetableभाज्या