शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

मोदी सरकारबरोबरच्या मतभेदांमुळे अरविंद पनगढिया यांनी दिला राजीनामा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 11:33 IST

‘नीति’ आयोगाचे पहिले उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी मंगळवारी अचानक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ठळक मुद्देदेशाची आर्थिक धोरणे ठरविण्यामध्ये पनगढिया अध्यक्ष असलेल्या निती आयोगाची महत्वाची भूमिका आहे. निती आयोग आणि सरकारमध्ये काही मुद्यांवर मतभेद झाले होते.

नवी दिल्ली, दि. 2 - ‘नीति’ आयोगाचे पहिले उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी मंगळवारी अचानक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण  देशाची आर्थिक धोरणे ठरविण्यामध्ये पनगढिया अध्यक्ष असलेल्या निती आयोगाची महत्वाची भूमिका आहे. आपल्याला अध्यापन करायचे असून कोलंबिया विद्यापीठाकडून सुट्टी वाढवून मिळत नसल्याने आपण राजीनामा देत आहोत असे कारण पनगढिया यांनी दिले असले तरी, प्रत्यक्षात त्यांच्या राजीनाम्यामागे अजूनही काही कारणे आहेत. 

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार निती आयोग आणि सरकारमध्ये काही मुद्यांवर मतभेद झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नियोजन आयोग मोडीत काढून निती आयोगाची स्थापना केली. पण दोघांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये भरपूर फरक होता. नियोजन आयोगामध्ये पंतप्रधानांच्यानंतर उपाध्यक्षाकडे अंतिम अधिकार असायचे. पण निती आयोगामध्ये वेगवेगळे उच्चअधिकारी विविध उपक्रम हाताळायचे. त्यामुळे निती आयोगामध्येच वेगवेगळी सत्ता केंद्रे तयार होत होती.

आणखी एक महत्वाचा फरक म्हणजे निती आयोगाच्या उपाध्यक्षाला कॅबिनेटचा दर्जा होता पण पनगढिया कधीही मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहिले नाहीत. नोटाबंदीचा कालावधी संपल्यानंतर करदात्याला विशेषकरुन महिला वर्गाला त्रास होऊ नये यासाठी नियम निश्चित करण्यासाठी पनगढिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीले होते. बँकेत अडीचलाखापर्यंत ज्यांनी रक्कम जमा केली आहे त्यांची कुठलीही चौकशी करु नये असा सल्ला पनगढिया यांनी दिला होता. एनडीए सरकारने पहिल्या दोनवर्षात ज्या सुधारणा हाती घेतल्या होत्या. त्यावरही पनगढिया नाराज असल्याचे बोलले जाते. 

पनगढिय यांनी पदावरून मुक्त करावे, अशी विनंती मोदी यांना दोन महिन्यांपूर्वी केली होती. त्यानुसार येत्या ३१ ऑगस्टपर्यंत मी आयोगाचे काम करीन. यापूर्वी डॉ. पनगढिया अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात जगदीश भगवती अध्यासनाचे प्राध्यापक होते. ते म्हणाले की, माझी रजा येत्या ५ सप्टेंबरला संपत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत आयोगाचे काम करून पुन्हा कोलंबिया विद्यापीठात अध्यापनाचे काम करण्याचे ठरविले आहे. विद्यापीठात जे काम करीत आहे ते सोडले तर आता वयाच्या ६४ व्या वर्षी मला तसे काम दुसरीकडे कुठे मिळणार नाही.

ख्यातनाम अर्थतज्ज्ञ-पनगढिया हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ असून, त्यांनी अध्यापन करण्याआधी जागतिक बँक व आशियाई विकास बँकेतही मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम केलेय. भारतीय अर्थव्यवस्था हा त्यांच्या अभ्यास व संशोधनाचा विशेष विषय राहिला आहे. भारत सरकारने मार्च २०१२मध्ये ‘पद्मभूषण’ किताब देऊन त्यांचा गौरव केला होता.