शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

मतदानाआधीच अरविंद केजरीवालांना मोठा धक्का; न्यायालयाच्या आदेशानंतर हरियाणात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 22:38 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही तास उरले असताना अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्येष्ठ वकील जगमोहन मनचंदा यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. केजरीवाल यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावल्याचा आणि दोन राज्यातील लोकांमध्ये चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा आरोप आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. या प्रकरणात, न्यायालयाच्या आदेशानंतर अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या इतर सदस्यांविरुद्ध हरियाणामध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील शाहबाद पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

वकील जगमोहन मनचंदा यांनी केजरीवाल यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप केला. "दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा सरकारने यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याबद्दल केलेले वक्तव्य निराधार आहे. या विधानामुळे हरियाणाच्या कारभारावर जनतेमध्ये शंका तर निर्माण होणारच आहे पण या विधानामुळे सर्वसामान्यांमध्ये घबराट आणि अस्वस्थता वाढण्याचीही शक्यता आहे. यमुना नदी कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धेचे प्रतीक असून केजरीवाल यांच्या वक्तव्याने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने केलेल्या अशा निराधार आणि अपमानास्पद वक्तव्यामुळे आंतरराज्य सौहार्द कमकुवत होतेच पण सरकारी संस्थांवरील जनतेचा विश्वासही कमी होतो," असं याचिकाकर्ते जगमोहन मनचंदा म्हणाले.

जगमोहन मनचंदा यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून केजरीवाल यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, असेही मनचंदा म्हणाले.

दरम्यान, २७ जानेवारी रोजी एका प्रचार सभेत अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजप आपल्या गलिच्छ राजकारणाने दिल्लीतील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवू इच्छित आहे. हरियाणातून पाठवण्यात येणाऱ्या पाण्यात विष मिसळले जात आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालHaryanaहरयाणा