शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

"अरविंद केजरीवालांना अटक करणं हाच उद्देश..."; आतिशी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 12:41 IST

अरविंद केजरीवाल यांना ईडीने नवव्यांदा समन्स पाठवल्यानंतर राज्याच्या अर्थमंत्री आतिशी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन तपास यंत्रणांसह मोदी सरकारवर सवाल उपस्थित केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने नवव्यांदा समन्स पाठवल्यानंतर राज्याच्या अर्थमंत्री आतिशी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन तपास यंत्रणांसह मोदी सरकारवर सवाल उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून आणखी एक समन्स मिळाला असून त्यांना दिल्ली जल बोर्डाशी संबंधित काही तपासात सहभागी होण्यास सांगितलं आहे. आम्ही याबाबत अनभिज्ञ आहोत. अरविंद केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे.

आतिशी पुढे म्हणाल्या की, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल न्यायालयात हजर झाले कारण त्यांनी सांगितलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ते स्वतः न्यायालयात जातील कारण आप कायदा आणि न्यायालयाचा आदर करतात. त्या पुढे म्हणाल्या की, केजरीवाल कोर्टात जात नाहीत, असे भाजपा नेते म्हणायचे, त्यांनी या नेत्यांना गप्प केलं. आता ईडीकडून पाठवले जाणारे समन्स कायदेशीर की बेकायदेशीर यावर न्यायालयात चर्चा होणार आहे.

केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना आतिशी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींना फक्त निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकायचं आणि त्यांना प्रचारापासून रोखायचं आहे. यामुळेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू होताच ती संपण्याची वाट पाहिली नाही काही तासांतच ईडीने केजरीवाल यांना आणखी एका खोट्या प्रकरणात समन्स पाठवले. जल बोर्डाचे प्रकरण कोणते आणि त्यात कोणते आरोप आहेत हे कळू शकलेले नाही. यामध्ये काय तपास सुरू आहे आणि हा घोटाळा आहे का, याचीही आम्हाला माहिती नाही. 

आतिशी पुढे म्हणाल्या की, जर ही प्रक्रिया तपास आणि न्यायासाठी होती तर मोदींचे ईडी सध्या सुरू असलेले न्यायालयीन प्रकरण संपण्याची वाट का पाहू शकत नाही? तपास, न्याय आणि सत्यापर्यंत पोहोचणे हा त्यांचा उद्देश नसून केवळ अरविंद केजरीवाल यांना अटक करणे हा त्यांचा उद्देश आहे. आज ईडी आणि सीबीआय नरेंद्र मोदींचे गुंड बनले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत पूर्वी जे व्हायचे तेच आता वास्तवात घडत आहे. जो मोदींना विरोध करतो, ईडी आणि सीबीआय त्यांच्या मागे लागतात. मोदींच्या या दोन गुंडांनी विरोधी पक्ष आणि नेत्यांना टार्गेट केलं आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदी