शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

“रामराज्याच्या प्रेरणेनेच सर्वांसाठी काम केले, राम मंदिर ही अभिमानाची बाब”: अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 12:56 IST

Arvind Kejriwal News: आपण त्याग करण्यापासून मागे हटता कामा नये, अशी शिकवण रामायणातून मिळते, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Arvind Kejriwal News: अयोध्येत झालेले राम मंदिर ही अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. रामराज्याची प्रेरणे घेऊनच दिल्लीत सर्वांसाठी काम केले, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

२२ जानेवारीला अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण जगासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. लोकांनी सर्वत्र खूप आनंद साजरा केला. रामललाचा संदेश आपण आपल्या जीवनात समाविष्ट केला पाहिजे. रामायणाचा उल्लेख करत अरविंद केजरीवाल म्हणाले की, भरत आणि राम यांनी राजपदासाठी संघर्ष केला नाही. पण आजच्या काळात दोन भाऊ राम नामाचा जप करतात आणि भूमीसाठी लढतात. प्रभू रामाने कधीही जातीच्या नावावर भेदभाव केला नाही, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

त्याग करण्यापासून मागे हटता कामा नये

रामायणाच्या कथेचा संदर्भ देत अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, भगवान रामाचा राज्याभिषेक होणार होता. अयोध्येत तयारी पूर्ण झाली होती. प्रभू राम अयोध्येचा राजा होणार याचा अयोध्येतील लोकांना आनंद झाला. अचानक पूर्वसंध्येला प्रभू रामांना संदेश येतो की, दशरथ त्यांना बोलावत आहेत. रामलला खोलीत आल्यावर पाहतात की, दशरथ खूप दुःखी आहे. कैकेयीने दोन अटी घातल्या. एक म्हणजे प्रभू रामाला १४ वर्षे वनवासात जावे लागेल आणि दुसरी म्हणजे भारताला राजा बनवावे लागेल. प्रभू रामाने दशरथाला सांगितले की, आपले वचन पाळले जाईल. कोणत्याही दुःखाशिवाय, चेहऱ्यावर हास्य घेऊन प्रभू रामांनी १४ वर्षांच्या वनवासासाठी अयोध्यो सोडली. हे आपल्याला शिकवते की, आपण त्याग करण्यापासून मागे हटता कामा नये, असे केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, ५०० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि न्यायालयीन लढ्यानंतर अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाले. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामभक्तांनी अयोध्येत मोठी गर्दी केली आहे. राम मंदिर खुले झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत जवळपास साडेसात लाख भाविकांनी रामदर्शन घेतले. एवढेच नव्हे तर राम मंदिराला ३.१७ कोटी रुपयांची देणगी मिळाली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या