शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अरविंद केजरीवाल यांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव, CBI च्या अटकेविरोधात दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 13:34 IST

Arvind Kejriwal : सध्या अरविंद केजरीवाल हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. याप्रकरणी आता अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयच्या अटकेला आणि रिमांडला आव्हान दिले आहे. सध्या अरविंद केजरीवाल हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

अरविंद केजरीवाल यांची तीन दिवसांची कोठडी शनिवारी संपली. यानंतर दिल्ली न्यायालयाने त्यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने म्हटले होते की, उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात त्यांचे नाव 'मुख्य सूत्रधार' म्हणून पुढे आले आहे. तर अरविंद केजरीवाल यांनी तपासात सहकार्य केले नाही आणि टाळाटाळ करणारी उत्तरे दिली, असा दावा करत सीबीआयने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. तसेच, अरविंद केजरीवाल साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात, असे सीबीआयने म्हटले होते.

दरम्यान, २९ जून रोजी विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. यावेळी आरोपीच्या विरुद्ध कटामध्ये उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणी करण्यात गुंतलेल्या मोठ्या संख्येत लोकांचा समावेश आहे. अवैधरीत्या कमावलेल्या पैशाच्या वापरात सूत्रधार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे, हे लक्षात घेता, आरोपीची कोठडीत रवानगी करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत, तपास अद्याप प्रगतिपथावर आहे आणि तपासादरम्यान आणखी काही साहित्य गोळा केले जाण्याची शक्यता असलेल्या आरोपीची कोठडीत चौकशी करावी लागेल, असे विशेष न्यायाधीश सुनेना शर्मा म्हणाल्या. 

१०० कोटींची लाच घेतल्याचा आरोपअरविंद केजरीवाल आणि अन्य काही आप नेत्यांवर मद्य धोरण बनवण्याच्या बदल्यात व्यापारी आणि राजकारण्यांच्या एका गटाकडून १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. दिल्लीच्या उपराज्यपालांनी मद्य परवाने देण्याच्या कथित अनियमिततेच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर लगेचच मद्य धोरण रद्द करण्यात आले होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय