शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

रामायणातील कथेत काय चूक करून गेले अरविंद केजरीवाल? भाजपनं केली ट्रोल करायला सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:56 IST

माता सीतेच्या अपहरणाची कथा सांगताना अरविंद केजरीवाल यांनी काही चुका केल्या, यानंतर, आता भाजपने त्यांना घेरायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा त्यांची 'निवडणूक हिंदू' म्हणून खिल्ली उडवली जात आहे.

आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी एका निवडणूक सभेदरम्यान रामायणातील एका घटनेचा उल्लेख केला. त्यावरून आता त्यांना ट्रोल केले जात आहे. माता सीतेच्या अपहरणाची कथा सांगताना अरविंद केजरीवाल यांनी काही चुका केल्या, यानंतर, आता भाजपने त्यांना घेरायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा त्यांची 'निवडणूक हिंदू' म्हणून खिल्ली उडवली जात आहे.

केजरीवाल सोमवारी सायंकाळी विश्वास नगरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी झोपडपट्टीवासीयांना भाजपबद्दल इशारा दिला आणि सीता हरणाची कहाणी सांगितली. केजरीवाल म्हणाले, 'एक दिवस भगवान राम अन्नाची व्यवस्था करण्यासाठी जंगलात गेलेले असतात. त्यांनी सीतेला त्याच्या झोपडीत सोडलेले असते आणि माता सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी लक्ष्मणावर सोपवलेली असते. दरम्यान, रावण सुवर्णमृग बणून येतो. यावेळी, आपल्याला हे हरण हवे आहे, असा आग्रह ती लक्ष्मणाकडे करते. लक्ष्मण म्हणतो की, माझ्यावर आपल्या रक्षणाची जबाबदारी आहे. यावर सीता म्हणते, नाही, मी तुला हरण पकडण्याचा आदेश देते. लक्ष्मणाकडे पर्यायच उरत नाही, तो गेला. यानंतर, रावणाने आपला वेश बदलला आणि माता सीता यांचे अपहरण केले.

पुढे केजरीवाल म्हणाले, "हे भाजपचे लोकही सोन्याच्या हरणांसारखे आहेत, त्यांच्या जाळ्यात अडकू नका, नाहीतर हरण होईल. झोपडपट्टीवासीयांनी सोनेरी हरणाच्या जाळ्यात अडकू नये. आजकाल ते तुमच्या मुलांसोबत कॅरम खेळत येत आहेत, निवडणुकीनंतर ते झोपडपट्ट्या पाडण्यासाठी बुलडोझर आणतील. काळजी करू नका, जोवर तुमचा हा मुलगा जिवंत आहे. मी बुलडोझरसमोर पडून राहीन, पण झोपडपट्टी पाडू देणार नाही.

कथेत काय चुकलं ?- रामायणातील एक कथा सांगताना अरविंद केजरीवाल यांनी काही चुका केल्या, ज्यामुळे भाजप त्यांना ट्रोल करत आहे. केजरीवाल म्हणाले की, भगवान राम अन्नाची व्यवस्था करण्यासाठी जंगलात गेले होते. मात्र, प्रत्यक्षात ते सोन्याच्या हरणाचा पाठलाग करत जंगलात गेले होते. माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की रावण सोन्याच्या हरणाच्या रूपात आला होता, परंतु सत्य हे आहे की मारीच नावाचा राक्षस हरणाचे रूप धारण करून आला होता. रावण ब्राह्मणाच्या वेशात भिक्षा मागण्यासाठी आला होता.

भाजपनं केलंय ट्रोल - भाजपचे माजी खासदार आणि नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांना आव्हान देणारे प्रवेश वर्मा यांनी X वर म्हटले आहे की, 'निवडणूक हिंदू अरविंद केजरीवाल यांच्या मते, 'जेव्हा श्री रामजी अन्नाची व्यवस्था करण्यासाठी जंगलात गेले होते, तेव्हा रावण सोन्याच्या हरणाच्या रूपात आला...' पण मी 'निवडनूक हिंदूला' सांगू इच्छितो की, रामायणात, राक्षस मारिच रावणासोबत आला आणि त्याने सुवर्ण मृगाचे रूप धारण केले होते. यानंतर, माता सीतेने लक्ष्मणाला नव्हे, तर भगवान श्रीरामजींना सुवर्ण हरण आणण्यास सांगितले होते, असे आहे 'निवडणूक हिंदू'चं फसवं ज्ञान...!'

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025