शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रामायणातील कथेत काय चूक करून गेले अरविंद केजरीवाल? भाजपनं केली ट्रोल करायला सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:56 IST

माता सीतेच्या अपहरणाची कथा सांगताना अरविंद केजरीवाल यांनी काही चुका केल्या, यानंतर, आता भाजपने त्यांना घेरायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा त्यांची 'निवडणूक हिंदू' म्हणून खिल्ली उडवली जात आहे.

आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी एका निवडणूक सभेदरम्यान रामायणातील एका घटनेचा उल्लेख केला. त्यावरून आता त्यांना ट्रोल केले जात आहे. माता सीतेच्या अपहरणाची कथा सांगताना अरविंद केजरीवाल यांनी काही चुका केल्या, यानंतर, आता भाजपने त्यांना घेरायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा त्यांची 'निवडणूक हिंदू' म्हणून खिल्ली उडवली जात आहे.

केजरीवाल सोमवारी सायंकाळी विश्वास नगरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी झोपडपट्टीवासीयांना भाजपबद्दल इशारा दिला आणि सीता हरणाची कहाणी सांगितली. केजरीवाल म्हणाले, 'एक दिवस भगवान राम अन्नाची व्यवस्था करण्यासाठी जंगलात गेलेले असतात. त्यांनी सीतेला त्याच्या झोपडीत सोडलेले असते आणि माता सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी लक्ष्मणावर सोपवलेली असते. दरम्यान, रावण सुवर्णमृग बणून येतो. यावेळी, आपल्याला हे हरण हवे आहे, असा आग्रह ती लक्ष्मणाकडे करते. लक्ष्मण म्हणतो की, माझ्यावर आपल्या रक्षणाची जबाबदारी आहे. यावर सीता म्हणते, नाही, मी तुला हरण पकडण्याचा आदेश देते. लक्ष्मणाकडे पर्यायच उरत नाही, तो गेला. यानंतर, रावणाने आपला वेश बदलला आणि माता सीता यांचे अपहरण केले.

पुढे केजरीवाल म्हणाले, "हे भाजपचे लोकही सोन्याच्या हरणांसारखे आहेत, त्यांच्या जाळ्यात अडकू नका, नाहीतर हरण होईल. झोपडपट्टीवासीयांनी सोनेरी हरणाच्या जाळ्यात अडकू नये. आजकाल ते तुमच्या मुलांसोबत कॅरम खेळत येत आहेत, निवडणुकीनंतर ते झोपडपट्ट्या पाडण्यासाठी बुलडोझर आणतील. काळजी करू नका, जोवर तुमचा हा मुलगा जिवंत आहे. मी बुलडोझरसमोर पडून राहीन, पण झोपडपट्टी पाडू देणार नाही.

कथेत काय चुकलं ?- रामायणातील एक कथा सांगताना अरविंद केजरीवाल यांनी काही चुका केल्या, ज्यामुळे भाजप त्यांना ट्रोल करत आहे. केजरीवाल म्हणाले की, भगवान राम अन्नाची व्यवस्था करण्यासाठी जंगलात गेले होते. मात्र, प्रत्यक्षात ते सोन्याच्या हरणाचा पाठलाग करत जंगलात गेले होते. माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की रावण सोन्याच्या हरणाच्या रूपात आला होता, परंतु सत्य हे आहे की मारीच नावाचा राक्षस हरणाचे रूप धारण करून आला होता. रावण ब्राह्मणाच्या वेशात भिक्षा मागण्यासाठी आला होता.

भाजपनं केलंय ट्रोल - भाजपचे माजी खासदार आणि नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांना आव्हान देणारे प्रवेश वर्मा यांनी X वर म्हटले आहे की, 'निवडणूक हिंदू अरविंद केजरीवाल यांच्या मते, 'जेव्हा श्री रामजी अन्नाची व्यवस्था करण्यासाठी जंगलात गेले होते, तेव्हा रावण सोन्याच्या हरणाच्या रूपात आला...' पण मी 'निवडनूक हिंदूला' सांगू इच्छितो की, रामायणात, राक्षस मारिच रावणासोबत आला आणि त्याने सुवर्ण मृगाचे रूप धारण केले होते. यानंतर, माता सीतेने लक्ष्मणाला नव्हे, तर भगवान श्रीरामजींना सुवर्ण हरण आणण्यास सांगितले होते, असे आहे 'निवडणूक हिंदू'चं फसवं ज्ञान...!'

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025