शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

"अरविंद केजरीवालांनी 'ती' सर्वात मोठी राजकीय चूक केली", प्रशांत किशोरांचं आपच्या पराभवावर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:35 IST

Prashant Kishor Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव झाला. या निकालाबद्दल पूर्वीचे राजकीय रणनीतिकार आणि जन सुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाष्य केले. 

Prashant Kishor Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठ्या पराभावाला सामोरं जावं लागलं. भाजपने तब्बल २७ वर्षांनी दिल्ली जिंकली. दिल्ली निकालानंतर आपच्या पराभवाची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहे. या निकालाबद्दल आता जन सुराज पक्षाचे प्रमुख आणि पूर्वीचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भूमिका मांडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'इंडिया टुडे' वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "अलिकडच्या काही वर्षामध्ये अरविंद केजरीवालांनी बदललेली राजकीय रणनीती, जसे की इंडिया आघाडीमध्ये सामील झाले, पण दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय. हा आम आदमी पक्षाच्या पराभवामागील एक प्रमुख कारण आहे."

केजरीवालांच्या निर्णयांवर बोट ठेवत प्रशांत किशोर म्हणाले, "आम आदमी पक्षाच्या पराभवाचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे गेल्या १० वर्षात त्यांच्या विरोधात तयार झालेली सत्ताविरोधी नाराजी. केजरीवालांची दुसरी चूक म्हणजे त्यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा." 

"खरंतर अरविंद केजरीवाल यांनी तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता, जेव्हा त्यांना मद्य धोरण प्रकरणात अटक केली गेली होती. पण, केजरीवालांनी जामीन मिळाल्यानंतर आणि निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देऊन दुसऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं. केजरीवालांची ही मोठी राजकीय चूक होती. त्याचा आपला जास्त फटका बसला", असे भाष्य प्रशांत किशोर यांनी केले. 

'केजरीवालांच्या प्रतिमेला तडा गेला'

प्रशांत किशोर म्हणाले, "राजकीय भूमिका बदलल्याने केजरीवालांच्या विश्वासार्हतेला तडा गेला. ते आधी इंडिया आघाडीत सामील झाले आणि नंतर दिल्लीत एकटे लढले. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला. अलिकडेच्या काळात त्याचे प्रशासकीय मॉडेलही कमकुवत झाले होते", असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.  

२७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचं सरकार

दिल्लीमध्ये भाजपने २७ वर्षानंतर प्रचंड बहुमत मिळवलं आहे. ७० सदस्य संख्या असलेल्या दिल्ली विधानसभेत भाजप ४८ जागांवर जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाला २२ जागापर्यंत मजल मारता आली. तर काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा शून्य जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालPrashant Kishoreप्रशांत किशोर