शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

Arvind Kejriwal: 'मी दहशतवादी असेल तर मला अटक का केली नाही?' अरविंद केजरीवाल यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 11:43 IST

Arvind Kejriwal: 'कुमार विश्वास हास्य कवी आहेत, ते काहीही बोलू शकतात. त्यांनी एखादी विनोदी विनोदी कविता केली असावी.'

नवी दिल्ली: पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थांबणार आहे. राज्यातील विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तत्पूर्वी, आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी त्यांच्यावरील आरोपांचे स्पष्टीकरण दिले आहे. मीडियाशी संवाद साधताना अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 'मी जर दहशतवादी असेल, तर मला 10 वर्षांत अटक का केली नाही?', असा सवाल त्यांनी केला. 

'10 वर्षे मला अटक का केली नाही?'केजरीवाल म्हणाले, 'गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खलिस्तानी समर्थक असल्याचे आरोप लावले जात आहेत. माझा देशाचे तुकडे करण्याचा वाड असल्याचे बोलले जात आहे. जर मी खलिस्तानी समर्थक किंवा दहशतवादी असेल, तर मग मागील 10 वर्षांपासून माझ्यावर कारवाई का केली नाही? मी 10 वर्षांपासून कट रचत होतो, हे तुम्हाला माहीत आहे, मग मला अटक का केली नाही? सुरुवातीचे तीन वर्षे काँग्रेसची आणि 7 वर्षे मोदीजींची आहेत. मोदीजी काय झोपले होते का? एजन्सी झोपली होती? मला अटक का झाली नाही? राहुल गांधी यांचेही तीन वर्षे सरकार होते. मला अटक का केली नाही?', असे प्रश्न केजरीवालांनी विचारले.

'नरेंद्र मोदी-राहुल गांधी एकच'ते पुढे म्हणाले, 'सर्वात आधी मला राहुल गांधींनी दहशतवादी म्हटले, पण लोक त्यांना गंभीर मानत नसल्याने लोकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. यानंतर मोदी, प्रियंका गांधी आणि सुखबीर सिंग बादल यांनीही हीच भाषा वापरली. सर्व लोक एकच भाषा बोलत आहेत. मोदीजी राहुल गांधींना गांभीर्याने घेत नव्हते, तेच आता त्यांना गांभीर्याने घेत आहेत. मोदीही आता राहुल गांधीसारखे झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

'कुमार विश्वास यांनी विनोदी कविता केली असेल'यावेळी केजरीवालांनी कवी कुमार विश्वास यांच्यावरही निशाणा साधला. कुमार विश्वास यांनी केजरीवालांवर थेट खलिस्तानचे समर्थक असल्याचा दावा केला आहे. त्यावर केजरीवाल म्हणाले की, 'कुमार विश्वास हास्य कवी आहेत, त्यांनी एखादी विनोदी कविता केली असावी. पण, विरोधी पक्षनेत्यांनी ही कविता गांभीर्याने घेतली. कुमार कवी आहे, तो काहीही बोलू शकतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी