शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal: 'मी दहशतवादी असेल तर मला अटक का केली नाही?' अरविंद केजरीवाल यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 11:43 IST

Arvind Kejriwal: 'कुमार विश्वास हास्य कवी आहेत, ते काहीही बोलू शकतात. त्यांनी एखादी विनोदी विनोदी कविता केली असावी.'

नवी दिल्ली: पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थांबणार आहे. राज्यातील विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तत्पूर्वी, आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी त्यांच्यावरील आरोपांचे स्पष्टीकरण दिले आहे. मीडियाशी संवाद साधताना अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 'मी जर दहशतवादी असेल, तर मला 10 वर्षांत अटक का केली नाही?', असा सवाल त्यांनी केला. 

'10 वर्षे मला अटक का केली नाही?'केजरीवाल म्हणाले, 'गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खलिस्तानी समर्थक असल्याचे आरोप लावले जात आहेत. माझा देशाचे तुकडे करण्याचा वाड असल्याचे बोलले जात आहे. जर मी खलिस्तानी समर्थक किंवा दहशतवादी असेल, तर मग मागील 10 वर्षांपासून माझ्यावर कारवाई का केली नाही? मी 10 वर्षांपासून कट रचत होतो, हे तुम्हाला माहीत आहे, मग मला अटक का केली नाही? सुरुवातीचे तीन वर्षे काँग्रेसची आणि 7 वर्षे मोदीजींची आहेत. मोदीजी काय झोपले होते का? एजन्सी झोपली होती? मला अटक का झाली नाही? राहुल गांधी यांचेही तीन वर्षे सरकार होते. मला अटक का केली नाही?', असे प्रश्न केजरीवालांनी विचारले.

'नरेंद्र मोदी-राहुल गांधी एकच'ते पुढे म्हणाले, 'सर्वात आधी मला राहुल गांधींनी दहशतवादी म्हटले, पण लोक त्यांना गंभीर मानत नसल्याने लोकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. यानंतर मोदी, प्रियंका गांधी आणि सुखबीर सिंग बादल यांनीही हीच भाषा वापरली. सर्व लोक एकच भाषा बोलत आहेत. मोदीजी राहुल गांधींना गांभीर्याने घेत नव्हते, तेच आता त्यांना गांभीर्याने घेत आहेत. मोदीही आता राहुल गांधीसारखे झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

'कुमार विश्वास यांनी विनोदी कविता केली असेल'यावेळी केजरीवालांनी कवी कुमार विश्वास यांच्यावरही निशाणा साधला. कुमार विश्वास यांनी केजरीवालांवर थेट खलिस्तानचे समर्थक असल्याचा दावा केला आहे. त्यावर केजरीवाल म्हणाले की, 'कुमार विश्वास हास्य कवी आहेत, त्यांनी एखादी विनोदी कविता केली असावी. पण, विरोधी पक्षनेत्यांनी ही कविता गांभीर्याने घेतली. कुमार कवी आहे, तो काहीही बोलू शकतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी