शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अरविंद केजरीवाल तुरुंगात, आता दिल्लीमध्ये या नेत्याला मिळणार तिरंगा फडणवण्याची संधी, नायब राज्यपालांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 18:57 IST

Independence Day News: दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी ह्या दिल्ली सरकारच्यावतीने तिरंगा फडकवतील, असं बोललं जात होतं. मात्र नायब राज्यपाल एल. जी. सक्सेना यांनी त्यांच्या नावाला पसंती दिलेली नाही. तर दिल्ली सरकारच्यावतीने तिरंगा फडकवण्यासाठी परिवहनमंत्री कैलाश गहलोत यांच्या नावावर नायब राज्यपालांच्या कार्यालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मागच्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यामुळे आता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनीदिल्लीमध्ये तिरंगा कोण फडकवणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी ह्या तिरंगा फडकवतील, असं बोललं जात होतं. मात्र नायब राज्यपाल एल. जी. सक्सेना यांनी त्यांच्या नावाला पसंती दिलेली नाही. तर दिल्ली सरकारच्यावतीने तिरंगा फडकवण्यासाठी परिवहनमंत्री कैलाश गहलोत यांच्या नावावर नायब राज्यपालांच्या कार्यालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 

दिल्लीमधील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगामध्ये आहेत. केजरीवाल यांना ईडीने याचवर्षी मार्च महिन्यात अटक केली होती. मात्र यासंदर्भातील खटल्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. पण ते तुरुंगातून सुटण्यापूर्वीच सीबीआयशी संबंधित अँटी करप्शन अॅक्ट अन्वये सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी त्यांना अटक केली. या खटल्यात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. मात्र याच खटल्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचे सहकारी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाला आहे. 

दरम्यान, दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी सांगितले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्यावतीने तिरंगा फडकवण्यासाठी नियुक्त करू शकत नाहीत. या विभागाचे मंत्री गोपाल राय यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या इच्छेनुसार आतिशी यांच्याकडून तिरंगा फडकवण्याची तयारी करण्यात यावी, असे आदेश दिले होते. गोपाल राय यांच्या पत्रावर मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिव नवीन कुमार चौधरी यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे आदेश बेकायदेशीर आहेत. त्यामुळे या आदेशांवर अंमलबजावणी करता येणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सहा ऑगस्ट रोजी नायब राज्यपाला व्ही. के. सक्सेना यांना लिहिलेलं पत्र हे कारागृह नियमांनुसार स्वीकारार्ह नाही. 

टॅग्स :delhiदिल्लीIndependence Dayस्वातंत्र्य दिन