शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल तुरुंगात, आता दिल्लीमध्ये या नेत्याला मिळणार तिरंगा फडणवण्याची संधी, नायब राज्यपालांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 18:57 IST

Independence Day News: दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी ह्या दिल्ली सरकारच्यावतीने तिरंगा फडकवतील, असं बोललं जात होतं. मात्र नायब राज्यपाल एल. जी. सक्सेना यांनी त्यांच्या नावाला पसंती दिलेली नाही. तर दिल्ली सरकारच्यावतीने तिरंगा फडकवण्यासाठी परिवहनमंत्री कैलाश गहलोत यांच्या नावावर नायब राज्यपालांच्या कार्यालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मागच्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यामुळे आता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनीदिल्लीमध्ये तिरंगा कोण फडकवणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी ह्या तिरंगा फडकवतील, असं बोललं जात होतं. मात्र नायब राज्यपाल एल. जी. सक्सेना यांनी त्यांच्या नावाला पसंती दिलेली नाही. तर दिल्ली सरकारच्यावतीने तिरंगा फडकवण्यासाठी परिवहनमंत्री कैलाश गहलोत यांच्या नावावर नायब राज्यपालांच्या कार्यालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 

दिल्लीमधील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगामध्ये आहेत. केजरीवाल यांना ईडीने याचवर्षी मार्च महिन्यात अटक केली होती. मात्र यासंदर्भातील खटल्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. पण ते तुरुंगातून सुटण्यापूर्वीच सीबीआयशी संबंधित अँटी करप्शन अॅक्ट अन्वये सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी त्यांना अटक केली. या खटल्यात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. मात्र याच खटल्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचे सहकारी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाला आहे. 

दरम्यान, दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी सांगितले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्यावतीने तिरंगा फडकवण्यासाठी नियुक्त करू शकत नाहीत. या विभागाचे मंत्री गोपाल राय यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या इच्छेनुसार आतिशी यांच्याकडून तिरंगा फडकवण्याची तयारी करण्यात यावी, असे आदेश दिले होते. गोपाल राय यांच्या पत्रावर मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिव नवीन कुमार चौधरी यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे आदेश बेकायदेशीर आहेत. त्यामुळे या आदेशांवर अंमलबजावणी करता येणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सहा ऑगस्ट रोजी नायब राज्यपाला व्ही. के. सक्सेना यांना लिहिलेलं पत्र हे कारागृह नियमांनुसार स्वीकारार्ह नाही. 

टॅग्स :delhiदिल्लीIndependence Dayस्वातंत्र्य दिन