शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Arvind Kejriwal : आधी ममता, मग नितीश... आता पुढचा नंबर आपचा?; अरविंद केजरीवालांनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:31 IST

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील जींद येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं. 

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून इंडिया आघाडीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधी राज्यातील सर्व जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नितीश कुमार यांना आपल्या बाजूने करून विरोधकांना मोठा धक्का दिला. काही महिन्यांतच एकापाठोपाठ एक दोन मोठे धक्के बसले असून आता आम आदमी पक्षाच्या भवितव्याबाबत चर्चेला उधाण आलं आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अलीकडेच दावा केला होता की, आम आदमी पक्ष राज्यातील सर्व 13 लोकसभेच्या जागा जिंकेल. पंजाब आणि दिल्लीत जागावाटपाबाबत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असून या दोन राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाने हरियाणामध्येही तीन जागांची मागणी केली आहे. हरियाणात आम आदमी पक्ष सक्रिय झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील जींद येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं. 

अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीसोबत लोकसभा निवडणूक लढवू आणि त्याचवेळी विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याची घोषणाही केली. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये, तर विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्ष सक्रिय झाला असून तयारी केली जात आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आज लोकांचा फक्त एकाच पक्षावर विश्वास आहे, तो म्हणजे आम आदमी पक्ष. त्यांनी दिल्ली आणि पंजाब सरकारच्या कामाचा उल्लेख केला आणि दोन्ही राज्यांमध्ये जनता आनंदी असल्याचं सांगितलं. आज हरियाणात मोठ्या बदलांची गरज आहे. केजरीवाल यांनी काँग्रेसचं नाव न घेता हल्लाबोल करताना म्हटलं की, राज्यातील जनता मागील सरकारांमुळे निराश झाली आहे. जनतेने प्रत्येक पक्षाला संधी दिली पण प्रत्येकाने आपली तिजोरी भरली.

दिल्ली आणि पंजाबमध्ये 24 तास वीज पुरवठा केला जातो. काँग्रेस, भाजपा, जेजेपी हे करू शकतात का? असा सवाल त्यांनी जनतेला केला. ते तसे करू शकत नाहीत. हे फक्त आम आदमी पक्षच करू शकतं असंही म्हटलं. केजरीवाल यांनी राज्यातील सर्व 90 विधानसभा जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि आम्ही लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीच्या बॅनरखाली लढणार असल्याचंही सांगितलं.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालPoliticsराजकारणAAPआप