शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Arvind Kejriwal : आधी ममता, मग नितीश... आता पुढचा नंबर आपचा?; अरविंद केजरीवालांनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:31 IST

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील जींद येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं. 

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून इंडिया आघाडीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधी राज्यातील सर्व जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नितीश कुमार यांना आपल्या बाजूने करून विरोधकांना मोठा धक्का दिला. काही महिन्यांतच एकापाठोपाठ एक दोन मोठे धक्के बसले असून आता आम आदमी पक्षाच्या भवितव्याबाबत चर्चेला उधाण आलं आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अलीकडेच दावा केला होता की, आम आदमी पक्ष राज्यातील सर्व 13 लोकसभेच्या जागा जिंकेल. पंजाब आणि दिल्लीत जागावाटपाबाबत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असून या दोन राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाने हरियाणामध्येही तीन जागांची मागणी केली आहे. हरियाणात आम आदमी पक्ष सक्रिय झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील जींद येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं. 

अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीसोबत लोकसभा निवडणूक लढवू आणि त्याचवेळी विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याची घोषणाही केली. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये, तर विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्ष सक्रिय झाला असून तयारी केली जात आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आज लोकांचा फक्त एकाच पक्षावर विश्वास आहे, तो म्हणजे आम आदमी पक्ष. त्यांनी दिल्ली आणि पंजाब सरकारच्या कामाचा उल्लेख केला आणि दोन्ही राज्यांमध्ये जनता आनंदी असल्याचं सांगितलं. आज हरियाणात मोठ्या बदलांची गरज आहे. केजरीवाल यांनी काँग्रेसचं नाव न घेता हल्लाबोल करताना म्हटलं की, राज्यातील जनता मागील सरकारांमुळे निराश झाली आहे. जनतेने प्रत्येक पक्षाला संधी दिली पण प्रत्येकाने आपली तिजोरी भरली.

दिल्ली आणि पंजाबमध्ये 24 तास वीज पुरवठा केला जातो. काँग्रेस, भाजपा, जेजेपी हे करू शकतात का? असा सवाल त्यांनी जनतेला केला. ते तसे करू शकत नाहीत. हे फक्त आम आदमी पक्षच करू शकतं असंही म्हटलं. केजरीवाल यांनी राज्यातील सर्व 90 विधानसभा जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि आम्ही लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीच्या बॅनरखाली लढणार असल्याचंही सांगितलं.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालPoliticsराजकारणAAPआप