शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

केजरीवालांची मोठी घोषणा! उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार

By देवेश फडके | Updated: January 28, 2021 13:18 IST

आगामी दोन वर्षांत देशातील सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणूक रिंगणार उतरण्याचे पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसहा राज्यातील निवडणुका लढवण्याचा आपचा निर्णयराष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चितउत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, पंजाब, गोव्यातील निवडणुका लढवणार

नवी दिल्ली : दिल्लीत एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर आम आदमी पक्ष (आप) अन्य राज्यातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दोन वर्षांत देशातील सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणूक रिंगणार उतरण्याचे पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. 

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, पंजाब, गोवा येथील निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार उभे करण्याचे निश्चित करण्यात आले आहेत. या बैठकीत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, देशातील शेतकरी अडचणीत आहे, दुःखी आहे. गेल्या २५ वर्षांत तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. नवीन केंद्रीय कृषी कायदे शेतीची वाट लावणारे आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीत घडलेला प्रकार निंदनीय आहे, असे केजरीवाल म्हणाले.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारामागे असलेल्या पक्षावर कठोर कारवाई झाली पाहिजे. एका सामान्य नागरिकाप्रमाणे शेतकऱ्यांचे समर्थन करण्याचे आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केले. गेल्या ७० वर्षांत सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. शेतकऱ्यांच्या मुलांना, वारसांना नोकरी मिळालेली नाही. शेतकऱ्यांचे मुद्दे अद्यापही निकाली लागलेले नाहीत, असे केजरीवाल यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्ली सोडल्यास गेल्या काही कालावधी झालेल्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला विशेष कामगिरी करता आलेली नाही. तरी आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाला जनतेला दखल घ्यायला लावतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल