शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

केजरीवालांची मोठी घोषणा! उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार

By देवेश फडके | Updated: January 28, 2021 13:18 IST

आगामी दोन वर्षांत देशातील सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणूक रिंगणार उतरण्याचे पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसहा राज्यातील निवडणुका लढवण्याचा आपचा निर्णयराष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चितउत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, पंजाब, गोव्यातील निवडणुका लढवणार

नवी दिल्ली : दिल्लीत एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर आम आदमी पक्ष (आप) अन्य राज्यातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दोन वर्षांत देशातील सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणूक रिंगणार उतरण्याचे पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. 

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, पंजाब, गोवा येथील निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार उभे करण्याचे निश्चित करण्यात आले आहेत. या बैठकीत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, देशातील शेतकरी अडचणीत आहे, दुःखी आहे. गेल्या २५ वर्षांत तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. नवीन केंद्रीय कृषी कायदे शेतीची वाट लावणारे आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीत घडलेला प्रकार निंदनीय आहे, असे केजरीवाल म्हणाले.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारामागे असलेल्या पक्षावर कठोर कारवाई झाली पाहिजे. एका सामान्य नागरिकाप्रमाणे शेतकऱ्यांचे समर्थन करण्याचे आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केले. गेल्या ७० वर्षांत सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. शेतकऱ्यांच्या मुलांना, वारसांना नोकरी मिळालेली नाही. शेतकऱ्यांचे मुद्दे अद्यापही निकाली लागलेले नाहीत, असे केजरीवाल यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्ली सोडल्यास गेल्या काही कालावधी झालेल्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला विशेष कामगिरी करता आलेली नाही. तरी आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाला जनतेला दखल घ्यायला लावतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल