शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

अरविंद इनामदार मुलाखत जोड

By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST

प्रश्न : बाहेरुन आलेल्या पथकाने जिल्‘ात हस्तक्षेप करून कारवाई करण योग्य आहे का?

प्रश्न : बाहेरुन आलेल्या पथकाने जिल्‘ात हस्तक्षेप करून कारवाई करण योग्य आहे का?
इनामदार : याला हस्तक्षेप म्हणता येणार नाही. तो वरिष्ठांचा अधिकार आहे. स्थानिक अधिकार्‍यांनी या गोष्टी समजून घ्याव्यात. आपल्या कामात त्यांनी कमी पडता कामा नये. मी स्वत: महानिरीक्षकांना सोबत घेऊन अचानक भेटी अथवा कारवाई केल्या आहेत. नंदुरबारमध्ये पोलीस अधीक्षक विरुध्द कर्मचारी हा सामना रंगणे चुकीचे आहे. महानिरीक्षकांची ती प्राथमिक जबाबदारी आहे. पोलीस खाते हे आर्मीनंतर दुसरे शिस्तीचे खाते आहे.

इन्फो.....
कायद्याचा दरारा संपला
अरविंद इनामदार म्हणाले, सध्या देशात कायद्याचा दरारा संपल्याची जाणीव होत आहे. तो संपता कामा नये आणि जर कायद्याचा दरारा राहीला नाही तर सर्व काही संपेल असा सूचक इशारा इनामदार यांनी दिला. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांना काम करणे अवघड झाले आहे.
अधिकारी व कर्मचारी यांच्यासेवेबाबत खूप तफावत आहे. आयपीएस अधिकार्‍यांना पाच वेळा पदोन्नती मिळते तर पोलिसाला फक्त दोन वेळा. महासंचालक पदावर असताना मी स्वत: पोलिसांचा पगार तीन वेळा वाढविला तर मोठ्या घरांचाही प्रश्न मार्गी लावला होता.

इन्फो.....
मारिया यांच्या बदलीची गरज नव्हती
शिना बोरा हत्या प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची बदली करण्याची गरजच नव्हती, चांगली प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे स्पष्ट मत इनामदार यांनी व्यक्त केले.या हत्याकांडात मारिया यांनी जास्त रस घेतला व कोणाला अडचणी निर्माण होतील असे कोणाला वाटत होते तर त्यांच्याकडून तपास काढून सीआयडी व अन्य यंत्रणेकडे सोपविता आला असता.
पंधरा दिवसात त्यांना पदोन्नती मिळणारच होती. या पंधरा दिवसात त्यांना हटवून सरकारला काय मिळणार होते असा सवाल करुन सरकारच्या या निर्णयाविरुध्द इनामदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारच्या अशा पध्दतीमुळे पोलिसांचे मनोधैर्य खचते असेही ते म्हणाले. मारिया यांची ही प्रशासकीय बदली आहे, असे सरकारकडून सांगितले जात असले तरी या कारणाचे आपण अजिबात समर्थन करणार नाही. ही प्रशासकीय बाब होऊच शकत नाही.